शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आणीबाणीविरुद्ध विद्रोह पुकारणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४९ जण तेव्हा कारावासात

By विकास राऊत | Updated: June 25, 2025 20:24 IST

५० वर्षांपूर्वी ‘इर्मजन्सी’विरोधात विद्रोह; राज्य शासनाकडून सन्मान मानधन

छत्रपती संभाजीनगर : आणीबाणीच्या काळात १९७५ ते १९७७ दरम्यान तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन, सत्याग्रह, मोर्चे काढून रस्त्यावर येणाऱ्यांना, तुरुंगवास भोगलेल्या लढवय्यांच्या संघर्षाला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण हाेत आहेत. जिल्ह्यातील १४९ लढवय्यांनी आणाबाणीला कडाडून विरोध करीत ५० वर्षांपूर्वी इंदिरा सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठविला होता. त्या लढवय्यांना २०१८ पासून राज्य सरकारकडून सन्मान मानधन देण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनेंतर्गत ही मानधन योजना राबविली जाते. आणीबाणीच्या (१९७५-७७) काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले गेले होते. याविरोधात लढा देणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तुरुंगवास, नजरकैद, हालअपेष्टा भोगलेल्या व्यक्तींना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाची घेतली भेटआणीबाणीतील लढवय्यांच्या लोकतंत्र सेनानी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांची भेट घेतली. विभागीय व जिल्हा पातळीवर आणीबाणीतील सेनानींचा सत्कार करण्याचे शासनाने सुचविले आहे. येथे २५ जून रोजी सत्कार समारंभ आयोजिला होता. परंतु मुंबईत शासकीय समारंभ होणार असल्यामुळे पुढच्या आठवड्यात हा समारंभ घेण्याचे ठरले आहे. आणीबाणीत किमान १ महिना तुरुंगवास किंवा ३ महिने नजरकैद झालेल्यांना आंदोलनाच्या पुराव्यासह अर्जाची शिफारस राज्यस्तरीय समितीकडून झाल्यावर जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत दरमहा लाभ दिला जातो.

आणीबाणीचा काळ व कारणे अशी...२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ (२१ महिने) आणीबाणीचा काळ होता. १९७१ मधील निवडणुकीत इंदिरा गांधी सरकार सत्तेत आले. उत्तर प्रदेशमधील राजनारायण यांनी इंदिरा गांधींच्या निवडणुकीला कोर्टात आव्हान दिले. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक अवैध ठरविली. त्यानंतर पंतप्रधानपदावरून त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, जयप्रकाश नारायण यांचे 'संपूर्ण क्रांती' आंदोलन जोर धरत होते. अनेक ठिकाणी सरकारविरोधी निदर्शने सुरू होती. इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडून अनुच्छेद ३५२ अनुसार ‘अंतर्गत अस्थिरता’ या कारणास्तव आणीबाणी जाहीर केली. यात अनेक मूलभूत अधिकारांवर गदा आली. विरोधकांची धरपकड करण्यात आली. देशभरात १ लाखाहून अधिक लोकांना तुरुंगात डांबले गेले होते.

हर्सूल तुरुंगात दीड महिना डांबलेकेंद्र सरकारने मूलभूत अधिकारांसह संघावर बंदी आणण्यासाठी पाऊल उचलले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कारवाई केली. हर्सूल तुरुंगात दीड महिना होतो. अनेक आठवणी आहेत. तारुण्याच्या काळात असलेली राष्ट्रप्रेमाची ऊर्जा आजही कायम आहे.- भालचंद्र कुलकर्णी, आणीबाणीतील सेनानी

पुण्यात सत्याग्रह केलाआणीबाणीच्या विरोधात पुण्यातील शिरूर भागात सत्याग्रह केला. महाविद्यालयीन काळ होता. पोलिसांनी कारवाई करून अनेक यातना दिल्या. येरवड्याच्या तुरुंगात डांबले. २५ रोजी ५० वर्षे होत आहेत. जुने दिवस नजरेसमोर येत आहेत. २०१८ साली फडणवीस सरकारच्या काळात सेनानी सन्मान योजना आणली. ठाकरे सरकारने ती बंद केली. पुढे शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली.- अनंत आचार्य, आणीबाणीतील सेनानी

१८ महिने नाशिकच्या तुरुंगात काढलेमला आणीबाणीच्या काळात चितेपिंपळगाव येथील शेतातून रात्री अटक केली. दोन दिवस चिकलठाणा पोलिस ठाण्यात ठेवल्यानंतर नाशिक येथील कारागृहात पाठविले. १८ महिने नाशिकच्या तुरुंगात होतो. त्यावेळी माझ्यासोबत शंभर ते दीडशे जनसंघाचे कार्यकर्ते व नेते होते.- रामभाऊ गावंडे, माजी आमदार 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर