शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

१४ वर्षांनंतर कामगारांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:04 PM

औरंगाबाद औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिल्याने कामगारांना १४ वर्षांनंतर न्याय मिळाला

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील इंडो-युरोपियन ब्रेव्हरेज कंपनी व्यवस्थापनाने युनियन लावण्याच्या कारणावरुन कंपनीतील कामगारांना कामावर येण्यास प्रतिबंध केला होता. मात्र, औरंगाबाद औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिल्याने कामगारांना १४ वर्षांनंतर न्याय मिळाला असल्याची माहिती कामगारातर्फे अ‍ॅड. प्रदीप शहाणे यांनी रविवारी बजाजनगर येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी या निर्णयाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

अ‍ॅड. शहाणे म्हणाले की, इंडो-युरोपियन ब्रेव्हरेज कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत कामगार युनियन लावण्याच्या कारणावरुन ८ मार्च २००५ मध्ये ६४ कामगारांना कामावर येण्यास प्रतिबंध केला. याविरोधात कामगारांनी ९ मार्च रोजी कंपनीसमोर आंदोलन केले. मात्र, सुरक्षा रक्षकांना गोळीबाराचे आदेश देवून हे आंदोलन मोडीत काढले. या गोळीबारात १० कामगार जखमी झाले होते. त्यांनतर यातील २२ कामगारांनी औरंगाबाद औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. यावर औद्योगिक न्यायालयाने ३१ मार्च २००८ रोजी कामगारांच्या बाजूने निर्णय देत संबंधित सर्व कामगारांना कामावर घेण्याचे व मार्च २००५ पासून वेतन देण्याचे कंपनी व्यवस्थापनास आदेश दिले. याविरोधात कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली. यावर न्यायमूर्ती व्ही.आर. किनगावकर यांनी ३ सप्टेंबर २०१० मध्ये निकाल देवून कंपनीची रिट याचिका फेटाळून लावली. या दोन्ही निर्णया विरुद्ध कंपनीने मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या डिव्हीजन बेंचपुढे अपिल दाखल केले. यावर २० मार्च २०१९ रोजी न्या. टी.व्ही. नलावडे व न्या. एस.के. कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. सुनावणी अंती डिव्हिजन बेंचने कंपनीचे अपील फेटाळून लावले व औद्योगिक न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवल्याचे अ‍ॅड. शहाणे यांनी सांगितले.

तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे कंपनीने पालन न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचेही अ‍ॅड. शहाणे यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर धनवटे, पराग शाह, रामेश्वर शेगावकर, महेंद्र गरड, सोमनाथ जाधव, शिवाजी गायकवाड आदी कामगारांची उपस्थिती होती. या प्रकरणी इंडो-युरोपियन ब्रेव्हरेज कंपनीचे अमित पारीख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकलान नाही.

टॅग्स :WalujवाळूजWaluj MIDCवाळूज एमआयडीसी