शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

रागाच्या भरात घर सोडलेली १४ बालके पालकांच्या स्वाधीन; रेल्वे पोलिसांची विधायक कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:48 IST

रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १४ बालकांना औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले

औरंगाबाद : हट्ट न पुरविल्याने वा इतर किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १४ बालकांना औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

अभ्यासाचा कंटाळा, टीव्ही पाहू न देणे, एखादी इच्छा पूर्ण न होणे वा आई-बाबा रागावले तर लहान मुले याचा राग धरून घरातून निघून जात असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. मुंबई वा उपनगरांमध्ये अशी अनेक उदाहरणे गत काही वर्षांत आढळून आलेली आहेत. मात्र, पोलिसांची सतर्कता व सजगतेमुळे ही बालके त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कार्यामुळे या मुलांचे भवितव्य धोक्यात जाण्यापासून वाचले आहे. 

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१८ या काळात तब्बल १४ बालके संशयास्पद स्थितीत रेल्वे पोलिसांना आढळून आली. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर पालकांना बोलावून घेत दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर ही बालके पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील एका खाजगी वसतिगृहात राहणारा व इयत्ता पाचवी शिकणारा सुरेश (नाव बदलले आहे) हा वसतिगृहातील लोक त्रास देतात म्हणून तेथून पळून आला होता. सुरेश मूळचा परतूर तालुक्यातील डोल्हारा येथील रहिवासी असून, शेतकरी असलेल्या त्याच्या पालकांनी केवळ शिक्षणासाठी त्याला औरंगाबाद शहरात ठेवले आहे. रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या मुलाची चौकशी केली. त्यानंतर एनजीओला फोन करून याची माहिती दिली. वसतिगृह चालकाला याची कल्पनाही नव्हती. रेल्वे पोलिसांनी सुरेशचे पालक, वसतिगृहचालक आणि एनजीओला  बोलावले. 

सर्वांचे समुपदेशन केल्यानंतर सुरेशची पुन्हा वसतिगृहात रवानगी करण्यात आली. ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आली नसती, तर या मुलाचे काय भवितव्य असते, याचा विचारच केलेला बरा. औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी आठ महिन्यांत अशी १४ बालके शोधली. त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ही कार्यवाही एएसआय दिलीप कांबळे, एसआयपीएफ एम.जी. कसबे, डी.आर. नरवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. 

चाईल्ड हेल्पलाईनचा आधार१०९८ या क्रमांकावरील चाईल्ड हेल्पलाईनच्या मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यासाठी आधार घेतला जातो. देशभरात विविध स्वयंसेवी संस्था या माध्यमातून कार्यरत असून, हेल्पलाईनद्वारे समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होतात. या हेल्पलाईनमुळे अनेक बालके सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

स्थानकासह परिसरात कुठलीही संशयास्पद व्यक्ती आढळून आली, तर त्याची चौकशी केली जाते. गत आठ महिन्यांत १४ बालके स्थानकावर आढळून आली. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.  - अरविंदकुमार शर्मा, निरीक्षक, रेल्वे पोलीस दल, औरंगाबाद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनPoliceपोलिस