शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

उद्दीष्ट १३७ चे, कर्ज प्रकरणे मात्र ४११

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

शिरीष शिंदे, बीड डिग्री नंतर मास्टर डिग्री मिळविल्यानंतर युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. शासकीय नोकऱ्यासाठी शर्थिचे प्रयत्न करावे लागत असून नोकरी मिळेलच याची गॅरंटी नसल्याने

शिरीष शिंदे, बीडडिग्री नंतर मास्टर डिग्री मिळविल्यानंतर युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. शासकीय नोकऱ्यासाठी शर्थिचे प्रयत्न करावे लागत असून नोकरी मिळेलच याची गॅरंटी नसल्याने युवक उद्योग व व्यवसायाकडे वळत असल्याने जिल्हा उद्योग केंद्रामध्ये २०१४-१५ वर्षासाठी ४११ कर्ज प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत मात्र शासनाने बँकाना केवळ १३७ प्रकरणांचे टार्गेट दिले आहे. बीड जिल्हा हा औद्यागिक दृष्ट्या मागासला असून येथे मोठ-मोठे उद्योग, धंदे किंवा कंपन्या नाहीत. बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या सोडल्या तर एकही कंपनी मोठा रोजगार देणारी नाही. यामुळे जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या अधिक आहे. रोजगार मिळत नसल्याने युवक उद्योगाकडे वळत आहेत. दर वर्षी जिल्हा उद्योग केंद्राकडे कर्ज प्रकरणे दाखल होण्याची संख्या वाढत चालली आहे. यावर्षीही शासनाने जिल्हा उद्योग केंद्र व बँकाना दिलेल्या प्रकरणपेक्षा तिप्पट कर्ज प्रकरणे दाखल झाले आहेत. जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांच्या संयुक्ताने सुधारीत बीज भांडवल योजनेर्तंगत १८ ते ५० वयोगट असणाऱ्यांना २५ लाखापर्यंत कर्ज दिले जाते. त्यासाठी तरतुद १० लाख रुपयांची आहे. या योजनेसाठी १७ कर्ज प्रकरणांची मंजुरी आहे मात्र १०२ कर्ज प्रकरणे दाखल झाली आहेत. आतापर्यंत ५ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून १५ टक्के, स्वत:चे १० टक्के व ७५ टक्के बँक फायनान्स करते. अनुसूचित जातीसाठी बीज भांडवल योजनासदरील योजनेसाठी २० प्रकरणांचे टार्गेट आहे तर ४१ प्रकरणे मंजुरीसाठी दाखल झाली आहेत. तरतूद १४ लाख रुपयांची असून त्यासाठी ६ प्रकरणे मंजूर झाली आहेत. जिल्हा उद्योग केंद्राकडून १५ टक्के, स्वत:चे १० टक्के व ७५ टक्के बँक फायनान्स करते. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनाया योजनेसाठी शिक्षणाची गरज नाही. सर्वसाधारण गटासाठी ६ लाख रुपयांची तरतूद आहे. १५ कर्ज प्रकरणांचे टार्गेट असून ३० प्रकरणे दाखल झाली आहे. ८ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंदची अनुसूचित जातींसाठी कर्ज योजनाटार्गेट १५ असून १८ प्रकरणे प्राप्त झाली आहेत. त्यापैकी ८ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यासाठी तरतूद २ लाख ३४ हजार रुपयांची आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमसदरील योजना केंद्र शासनाची आहे. योजनेच्या सुरुवातील जुन महिन्यात जाहिरात येते व अर्ज मागविण्यात येतात. प्रकरणे दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी होेते. कर्ज मंजुरीसाठी पात्र ठरलेल्यांच्या मुलखती घेण्यात येतात. सेवा उद्योगासाठी १० लाख रुपये तर उद्योगासाठी २५ लाख रुपये कर्ज मंजुर करण्यात येते. १५ टक्के ते ३५ टक्क्यांपर्यंत केंद्राकडून अनुदान मिळते.