शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरात खर्चाच्या तुलनेत पाणीपुरवठ्यात दरवर्षी १२५ कोटींची तूट

By मुजीब देवणीकर | Updated: December 22, 2023 18:40 IST

देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जवळपास १४ लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी तब्बल १५० कोटी रुपये खर्च करावे लागतात. खर्चाच्या तुलनेत १२५ कोटींची किमान तूट सहन करावी लागते. दोन वर्षांपूर्वी पाणीपट्टी खूप जास्त होत असल्यामुळे महापालिकेने ४ हजार ५० वरून पाणीपट्टी २ हजार रुपयांवर आणली. त्यानंतरही नागरिकांकडून प्रतिसाद नाही. फेब्रवारी २०२४ मध्ये ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी सुरू होईल. या योजनेचा वार्षिक खर्च किमान ५० कोटीने वाढणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास खर्च १३८ कोटींपर्यंत जाणार आहे.

देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत. या तुलनेत पाणीपट्टी वसुली जेमतेम २५ ते ३० कोटी होते. १२५ कोटींची तूट प्रशासनाला सहन करावी लागते. दोन महिन्यांनंतर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी सुरू होणार आहे. जुन्या तिन्ही योजना सुरू ठेवल्या तर खर्च ३०० कोटींपर्यंत जाईल.

पाणीपट्टी वसुलीचे आकडेवर्षे------------वसुली कोटीत२०१८-१९------२६.२६२०१९-२०------२९.२९२०२०-२१-------२९.०६२०२१-२२-------३७.५३२०२२-२३--------२५.८२२०२३-२४--------१५.२८ (१८ डिसेंबरपर्यंत)

पाणीपट्टी अर्ध्यावर; तरी वसुली नाहीसमांतर जलवाहिनी योजनेसाठी महापालिकेने पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये केली होती. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी छत्रपती संभाजीनगर महापालिकेची असल्याची ओरड होऊ लागली. त्यामुळे प्रशासनाने २०२२ मध्ये पाणीपट्टी अर्ध्यावर म्हणजेच, २ हजार रुपये केली. त्यानंतरही नागरिक पाणीपट्टी भरायला तयार नाहीत.

सर्वसामान्य नागरिकांचा रोषमहापालिकेने खंडपीठात लेखी स्वरूपात प्रत्येक वसाहतीला पाचव्या दिवशी पाणी देण्याचे आश्वासन दिले. हे वेळापत्रक पाळले जात नाही. आठवड्यातून एकदाच नागरिकांना पाणी मिळते.

नळांना मीटर बसविण्याची योजनानवीन पाणीपुरवठा योजनेचा खर्च २७४० कोटी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्यानंतर, प्रत्येक नळाला मीटर बसवा, असे योजनेत म्हटले आहे. अद्याप तरी मीटर कोण बसविणार, हे उघड नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २४ तास ७ दिवस पाणी मिळेल, असा दावा करीत आहे. त्यासाठी मीटर बंधनकारक असल्याचे प्राधिकरणचे म्हणणे आहे.

खर्चाचे अंदाजपत्रक तयारनवीन पाणीपुरवठा योजना पूर्णपणे राबविण्यासाठी वीज, केमिकल, कर्मचारी हा खर्च गृहीत धरला आहे. दरवर्षी १३८ कोटी रुपये खर्च राहील.- दीपक काेळी, कार्यकारी अभियंता, मजीप्रा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका