शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

छत्रपती संभाजीनगरात खर्चाच्या तुलनेत पाणीपुरवठ्यात दरवर्षी १२५ कोटींची तूट

By मुजीब देवणीकर | Updated: December 22, 2023 18:40 IST

देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जवळपास १४ लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी तब्बल १५० कोटी रुपये खर्च करावे लागतात. खर्चाच्या तुलनेत १२५ कोटींची किमान तूट सहन करावी लागते. दोन वर्षांपूर्वी पाणीपट्टी खूप जास्त होत असल्यामुळे महापालिकेने ४ हजार ५० वरून पाणीपट्टी २ हजार रुपयांवर आणली. त्यानंतरही नागरिकांकडून प्रतिसाद नाही. फेब्रवारी २०२४ मध्ये ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी सुरू होईल. या योजनेचा वार्षिक खर्च किमान ५० कोटीने वाढणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास खर्च १३८ कोटींपर्यंत जाणार आहे.

देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत. या तुलनेत पाणीपट्टी वसुली जेमतेम २५ ते ३० कोटी होते. १२५ कोटींची तूट प्रशासनाला सहन करावी लागते. दोन महिन्यांनंतर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी सुरू होणार आहे. जुन्या तिन्ही योजना सुरू ठेवल्या तर खर्च ३०० कोटींपर्यंत जाईल.

पाणीपट्टी वसुलीचे आकडेवर्षे------------वसुली कोटीत२०१८-१९------२६.२६२०१९-२०------२९.२९२०२०-२१-------२९.०६२०२१-२२-------३७.५३२०२२-२३--------२५.८२२०२३-२४--------१५.२८ (१८ डिसेंबरपर्यंत)

पाणीपट्टी अर्ध्यावर; तरी वसुली नाहीसमांतर जलवाहिनी योजनेसाठी महापालिकेने पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये केली होती. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी छत्रपती संभाजीनगर महापालिकेची असल्याची ओरड होऊ लागली. त्यामुळे प्रशासनाने २०२२ मध्ये पाणीपट्टी अर्ध्यावर म्हणजेच, २ हजार रुपये केली. त्यानंतरही नागरिक पाणीपट्टी भरायला तयार नाहीत.

सर्वसामान्य नागरिकांचा रोषमहापालिकेने खंडपीठात लेखी स्वरूपात प्रत्येक वसाहतीला पाचव्या दिवशी पाणी देण्याचे आश्वासन दिले. हे वेळापत्रक पाळले जात नाही. आठवड्यातून एकदाच नागरिकांना पाणी मिळते.

नळांना मीटर बसविण्याची योजनानवीन पाणीपुरवठा योजनेचा खर्च २७४० कोटी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्यानंतर, प्रत्येक नळाला मीटर बसवा, असे योजनेत म्हटले आहे. अद्याप तरी मीटर कोण बसविणार, हे उघड नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २४ तास ७ दिवस पाणी मिळेल, असा दावा करीत आहे. त्यासाठी मीटर बंधनकारक असल्याचे प्राधिकरणचे म्हणणे आहे.

खर्चाचे अंदाजपत्रक तयारनवीन पाणीपुरवठा योजना पूर्णपणे राबविण्यासाठी वीज, केमिकल, कर्मचारी हा खर्च गृहीत धरला आहे. दरवर्षी १३८ कोटी रुपये खर्च राहील.- दीपक काेळी, कार्यकारी अभियंता, मजीप्रा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका