शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नगरसेवक बमणेसह १२ जणांवर गुन्हा दाखल; कचरा टाकण्यास विरोध पडला महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:12 IST

हर्सूल सावंगी येथे प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास विरोध करून दगडफेक करणारे नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांवर शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनगरसेवक पूनम बमणे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यास कडाडून विरोध केला.वाहनांवर दगडफेक, अधिका-यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

औरंगाबाद : हर्सूल सावंगी येथे प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास विरोध करून दगडफेक करणारे नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांवर शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक प्रकरणाची गंभीर दखल घेत बुधवारी मनपा प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

महापालिकेने शहरात प्रक्रिया केलेला कचरा वर्गीकरण करण्यासाठी झाल्टा आणि हर्सूल येथे टाकला आहे. २८ एप्रिलला हर्सूल येथे कचरा टाकण्यात येत असताना नगरसेवक पूनम बमणे यांनी कचरा टाकण्यास विरोध दर्शविला होता. या दरम्यान त्यांनी समर्थकासह स्वत: हातात दगड उचलून मनपाच्या वाहनावर फेकला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली होती. यासोबतच अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिले. यानुसार आज नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्हा हर्सूल ठाण्यात दाखल करण्यात आला. बमने यांच्या विरोधात हा पहिलाच गुन्हा असून या प्रकरणावरून त्यांचे नगरसेवकपदही रद्द होऊ शकते.

काय आहे प्रकरण ?मागील काही दिवसांपासून मनपा प्रक्रिया केलेला कचरा हर्सूल व झाल्टा येथे टाकत आहे. हर्सूल येथे कचरा टाकत असताना दि. २८ एप्रिलला भाजप नगरसेवक पूनम बमणे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यास कडाडून विरोध केला. वाहनांवर दगडफेक, अधिका-यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतोय, तेथून जवळच गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.पावसाळ्यात पाणी दूषित होईल, कचऱ्यावर केमिकल फवारणी करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यासोबतच बमणे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांच्यासोबत हुज्जत घालत धक्काबुक्कीही केली. नगरसेवक समर्थक रहिम पटेल यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मनपाच्या वाहनांवर प्रचंड दगडफेक सुरू केली. वाढता विरोध लक्षात घेऊन २५ पेक्षा अधिक कचऱ्याची वाहने परत मध्यवर्ती जकात नाक्यावर नेण्यात आली.

टॅग्स :Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नhersulहर्सूलAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस