शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील १२ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी काढला रबीचा पीक विमा, गतवर्षीच्या तुलनेत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:31 IST

राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी आजपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १२ लाख ४२ हजार ६९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामुळे मराठवाड्यातील १६ लाख ८५ हजार ७३० हेक्टरवरील पिकांना विम्याचे छत्र लाभले.

राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे. रब्बीतील काही पिकांचा विमा उतरविण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत होती. काहींसाठी १५ डिसेंबर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी तब्बल २ लाख २० हजार ४३२ विमा अर्ज दाखल केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १ लाख २० हजार ४९४ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित झाली आहेत. जालना जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ९४९ शेतकऱ्यांनी २ लाख ५२ हजार ५८० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. बीड जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १२१ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ६५० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ९ हजार १८९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवीत त्यांच्या १ लाख ७७ हजार ६१० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. हिंगोली जिल्ह्यातील ५९ हजार २१० शेतकऱ्यांनी ८४ हजार ५४० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. लातूर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार १६७ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ७२० हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण दिले. नांदेडमधील १ लाख ८४ हजार १९६ शेतकऱ्यांनी २ लाख ३२ हजार ७२० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. परभणी जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ३४९ शेतकऱ्यांनी ३ लाख २८ हजार ४३० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सव्वा लाख कमी अर्जगतवर्षी कमी पाऊस होता, यामुळे रब्बी हंगामातील पेराही कमी असताना जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार २४३ पीक विम्याचे अर्ज कंपनीकडे शेतकऱ्यांनी दाखल केले होते. गतवर्षी १ लाख ७७ हजार ९५९ हेक्टरवरील पिके संरक्षित होती. यावर्षी पुरेशा पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले. असे असताना आजपर्यंत जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनीच २ लाख२० हजार ४३२ विमा अर्ज भरले. यामुळे १ लाख २० हजार ४९४ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrop Insuranceपीक विमाMarathwadaमराठवाडा