शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मराठवाड्यातील १२ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी काढला रबीचा पीक विमा, गतवर्षीच्या तुलनेत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:31 IST

राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी आजपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १२ लाख ४२ हजार ६९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामुळे मराठवाड्यातील १६ लाख ८५ हजार ७३० हेक्टरवरील पिकांना विम्याचे छत्र लाभले.

राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे. रब्बीतील काही पिकांचा विमा उतरविण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत होती. काहींसाठी १५ डिसेंबर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी तब्बल २ लाख २० हजार ४३२ विमा अर्ज दाखल केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १ लाख २० हजार ४९४ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित झाली आहेत. जालना जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ९४९ शेतकऱ्यांनी २ लाख ५२ हजार ५८० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. बीड जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १२१ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ६५० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ९ हजार १८९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवीत त्यांच्या १ लाख ७७ हजार ६१० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. हिंगोली जिल्ह्यातील ५९ हजार २१० शेतकऱ्यांनी ८४ हजार ५४० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. लातूर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार १६७ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ७२० हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण दिले. नांदेडमधील १ लाख ८४ हजार १९६ शेतकऱ्यांनी २ लाख ३२ हजार ७२० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. परभणी जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ३४९ शेतकऱ्यांनी ३ लाख २८ हजार ४३० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सव्वा लाख कमी अर्जगतवर्षी कमी पाऊस होता, यामुळे रब्बी हंगामातील पेराही कमी असताना जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार २४३ पीक विम्याचे अर्ज कंपनीकडे शेतकऱ्यांनी दाखल केले होते. गतवर्षी १ लाख ७७ हजार ९५९ हेक्टरवरील पिके संरक्षित होती. यावर्षी पुरेशा पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले. असे असताना आजपर्यंत जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनीच २ लाख२० हजार ४३२ विमा अर्ज भरले. यामुळे १ लाख २० हजार ४९४ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrop Insuranceपीक विमाMarathwadaमराठवाडा