शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

मराठवाड्यातील १२ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी काढला रबीचा पीक विमा, गतवर्षीच्या तुलनेत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:31 IST

राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी आजपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १२ लाख ४२ हजार ६९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामुळे मराठवाड्यातील १६ लाख ८५ हजार ७३० हेक्टरवरील पिकांना विम्याचे छत्र लाभले.

राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे. रब्बीतील काही पिकांचा विमा उतरविण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत होती. काहींसाठी १५ डिसेंबर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी तब्बल २ लाख २० हजार ४३२ विमा अर्ज दाखल केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १ लाख २० हजार ४९४ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित झाली आहेत. जालना जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ९४९ शेतकऱ्यांनी २ लाख ५२ हजार ५८० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. बीड जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १२१ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ६५० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ९ हजार १८९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवीत त्यांच्या १ लाख ७७ हजार ६१० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. हिंगोली जिल्ह्यातील ५९ हजार २१० शेतकऱ्यांनी ८४ हजार ५४० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. लातूर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार १६७ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ७२० हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण दिले. नांदेडमधील १ लाख ८४ हजार १९६ शेतकऱ्यांनी २ लाख ३२ हजार ७२० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. परभणी जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ३४९ शेतकऱ्यांनी ३ लाख २८ हजार ४३० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सव्वा लाख कमी अर्जगतवर्षी कमी पाऊस होता, यामुळे रब्बी हंगामातील पेराही कमी असताना जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार २४३ पीक विम्याचे अर्ज कंपनीकडे शेतकऱ्यांनी दाखल केले होते. गतवर्षी १ लाख ७७ हजार ९५९ हेक्टरवरील पिके संरक्षित होती. यावर्षी पुरेशा पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले. असे असताना आजपर्यंत जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनीच २ लाख२० हजार ४३२ विमा अर्ज भरले. यामुळे १ लाख २० हजार ४९४ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrop Insuranceपीक विमाMarathwadaमराठवाडा