शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दलित वस्ती सुधार योजनेतील ११९ विजेचे खांब गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:09 IST

दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या  तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

औरंगाबाद : दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या  अधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

भीमनगर, वॉर्ड क्रमांक-१३ या परिसरात निसर्ग कॉलनी, राजनगर, ग्रीनसिटी, लालमाती, सम्राट अशोक सोसायटी, जेतवन हाऊसिंग सोसायटी  आदी भागांत १५ हजारांवर नागरिक राहतात. येथे दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून २१९ खांब बसविण्याचे काम हाती घेण्यात आले  होते. परंतु त्यानंतरही परिसरात खांबांसाठी अर्ज आले. यावरून सतीश शेगावकर यांनी यासंदर्भात महावितरणकडे तक्रार केली. काम पूर्ण न करताच बिल उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ यांच्यासह  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली.

वीज खांबांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून आलेला पैसा कामे न करताच हडप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत २१९ पैकी ११९ खांब गायब आहे. याप्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केल्याचे सतीश शेगावकर म्हणाले.  याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार परिसरात पाहणी केली असून खांब टाकल्याचे कंत्राटदाराचे  म्हणणे आहे. त्यामुळे समिती स्थापन करून परिसरात पाहणी करून प्रत्येक खांबाची मोजणी केली जाणार आहे. कुठे खांब टाकले, हे समितीला  कंत्राटदाराला दाखवावे लागणार आहे, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ म्हणाले.

 

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा