शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दलित वस्ती सुधार योजनेतील ११९ विजेचे खांब गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:09 IST

दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या  तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

औरंगाबाद : दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या  अधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

भीमनगर, वॉर्ड क्रमांक-१३ या परिसरात निसर्ग कॉलनी, राजनगर, ग्रीनसिटी, लालमाती, सम्राट अशोक सोसायटी, जेतवन हाऊसिंग सोसायटी  आदी भागांत १५ हजारांवर नागरिक राहतात. येथे दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून २१९ खांब बसविण्याचे काम हाती घेण्यात आले  होते. परंतु त्यानंतरही परिसरात खांबांसाठी अर्ज आले. यावरून सतीश शेगावकर यांनी यासंदर्भात महावितरणकडे तक्रार केली. काम पूर्ण न करताच बिल उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ यांच्यासह  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली.

वीज खांबांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून आलेला पैसा कामे न करताच हडप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत २१९ पैकी ११९ खांब गायब आहे. याप्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केल्याचे सतीश शेगावकर म्हणाले.  याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार परिसरात पाहणी केली असून खांब टाकल्याचे कंत्राटदाराचे  म्हणणे आहे. त्यामुळे समिती स्थापन करून परिसरात पाहणी करून प्रत्येक खांबाची मोजणी केली जाणार आहे. कुठे खांब टाकले, हे समितीला  कंत्राटदाराला दाखवावे लागणार आहे, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ म्हणाले.

 

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा