शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देवगिरी साखर कारखान्याच्या ११०० कर्मचाऱ्यांना तब्बल १३ वर्षानंतर मिळाला थकीत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 18:05 IST

११०० कर्मचाऱ्याना बारा वर्षाचे साडेअकरा कोटी मिळाले 

फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्याचे तेरा वर्षा पूर्वीचे भविष्य निर्वाह निधी व थकीत पगार ११ कोटी ५० लाख रुपये रुपये प्राप्त झाले असून ते ११०० कर्मचाऱ्यांना वाटप केले जात आहेत.  यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून आनंदाचे वातावरण आहे. 

फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर या दोन तालुक्याच्या कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांच्या मालकीचा देवगिरी सहकारी साखर कारखाना हा  एकमेव सहकारी कारखाना आहे. एकेकाळी फुलंब्री शहराच्या वैभवात भर पडणारा हा कारखाना राजकीय हस्तक्षेपामुळे बंद पडून कर्जबाजारी झाला. २०१२ पासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे. येथे ११०० कर्मचारी काम करीत होते. त्या कर्मचाऱ्याचे २००० ते २०१२ पर्यंतचा पगार थकीत होता. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही त्या कार्यालयाला मिळाली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून अवसायकच्या ताब्यात कारखाना आहे. दरम्यान, देवगिरी कारखान्याची जमीन समृद्धी महामार्गा मध्ये गेल्याने यातून २४ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम ऋण वसुली प्राधिकरण विभागाकडे होती. थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळावी म्हणून कर्मचारी वर्गाकडून सतत मागणी केली जात होती. या मागणीचा अवसायक श्रीराम सोन्ने यांनी पाठपुरवा केला. यानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली आहे. देवगिरी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या ११०० कर्मचाऱ्यांना थकीत पगारा पोटी साडेपाच कोटी रुपये प्राप्त झाले असून ते वाटप सुरु आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीची देखील साडेपाच कोटी रुपये ही ऋण वसुली विभागाने सबंधित कार्यालयाला दिले. एकूण ११ कोटी रुपये प्राप्त झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती कामगार प्रतिनिधी दादा सय्यद यांनी दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखानेAgriculture Sectorशेती क्षेत्र