शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

'११ वर्षीय मुलाला तलावात बुडवून मारले'; न्यायालयाच्या आदेशाने पाच बालकांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 13:40 IST

जुन्या वादातून मुलाला तलावात पाडून वर येणाचा प्रयत्न करत असताना खाली दाबले

ठळक मुद्देवर्षभरापूर्वी तलावात बुडालेल्या मुलाचा खून झाल्याची आईची तक्रारया प्रकरणी सातारा पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे

औरंगाबाद : वर्षभरापूर्वी वाल्मीच्या तलावात बुडून मरण पावलेल्या ११ वर्षीय मुलाचा त्याच्या सोबतच्या ९ ते १४ वर्ष वयाच्या मुलांनीच बुडवून खून केल्याची तक्रार मृताच्या मातेने सातारा ठाण्यात नोंदविली. सातारा पोलिसांनी १३ जुलै रोजी संशयित मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तक्रारदार प्रतिभा दत्ता शिंदे (रा. ईटखेडा) यांचा मोठा मुलगा रोहन दत्ता शिंदे (वय ११) हा २५ ऑगस्ट २०२० रोजी वाल्मीच्या तलावात बुडून मरण पावला होता. या प्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. रोहनसोबत तलावावर गेलेल्या अवधूत जगदाळे, नितीन, रोशन आणि बेबी (पूर्ण नाव कळू शकले नाही) यांच्याकडून आईने घटनेची माहिती घेतली. त्यानुसार, ते सर्व जण तलावावर गेले तेव्हा तेथे आधीच कॉलनीतील १४ वर्षांचा मुलगा पोहत होता. त्याने जुन्या वादातून रोहनसोबत वाद घातला. त्याने तीन जणांना धक्का देऊन तलावात पाडले. रोहन तलावातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने रोहनच्या डोक्यावर हात ठेवून त्यास पाण्यात बुडवले. या घटनेची कुणाला माहिती दिली तर जीवे मारीन, अशी धमकी त्याने दिली होती, असे त्या बालकांनी सांगितल्याचे प्रतिभा यांनी तक्रारीत नमूद केले.

यापूर्वी सातारा पोलिसांनी त्यांच्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा नोंदविण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात तक्रार केली होती. न्यायालयाने गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश सातारा पोलिसांना दिले. त्यानुसार १३ जुलै रोजी सातारा ठाण्यात रोहनसोबत त्या दिवशी तलावावर गेलेल्या पाच अल्पवयीन मुलांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेची नव्याने चौकशी सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्याची घटनास्थळी धावखुनाचा गुन्हा नोंद होताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक निरीक्षक सुनील कराळे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी वाल्मी तलावाला मंगळवारी आणि बुधवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद