शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
2
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
3
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
4
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
5
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
6
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
7
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
8
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
9
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
10
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
11
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
12
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
13
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
14
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
15
IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला
16
Parth Pawar Land Deal:२१ कोटींचे मुद्रांक शुल्क  आम्ही भरणारच नाही; पार्थ पवारांच्या कंपनीचा न्यायालयात नकार
17
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
18
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
19
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
20
ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ उठविण्यास टेंबा केला अन् १०० वर्ष जुने चिंचेच झाड झाले भस्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 12:00 IST

बुधवारी सायंकाळी चिंचेच्या झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठविण्यासाठी काही ग्रामस्थांनी गोवऱ्या पेटवल्या होत्या.

ठळक मुद्देतालुक्यातील कसाबखेडा गावात व परिसरात गेल्या शंभर ते दीडशे वर्षापासून हजारो चिंचेचे महाकाय वृक्ष आहेत.या झाडाशेजारी अनेक लहानमोठे दुकाने आहेत. आग लवकर आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

खुलताबाद ( औरंगाबाद ) : तालुक्यातील कसाबखेडा येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महाकाय चिंचेच्या झाडाने मध्यरात्री पेट घेतला. बुधवारी सायंकाळी चिंचेच्या झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठविण्यासाठी काही ग्रामस्थांनी गोवऱ्या पेटवल्या होत्या. तेव्हा आतून पोकळ झालेल्या झाडाने पेट घेतला. यावेळी ग्रामस्थांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली होती. मात्र, यानंतर पुन्हा मध्यरात्री आग भडकून हे महाकाय झाड सकाळपर्यंत जळत होते. सकाळी औरंगाबाद अग्निशमन दलाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. 

तालुक्यातील कसाबखेडा गावात व परिसरात गेल्या शंभर ते दीडशे वर्षापासून हजारो चिंचेचे महाकाय वृक्ष आहेत. गावात चिंचेचा व्यापारही मोठ्याप्रमाणात चालतो. दरम्यान, गावातील बाजारपेठेतील रिक्षा स्टँडजवळ जवळपास शंभर वर्ष जुने चिंचेचे झाड आहे. यावर मधमाशांचे मोहोळ होते. बुधवारी काही ग्रामस्थांनी शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्याच्या धुराने झाडावरील मोहोळ उठवले. पंरतू, चिंचे झाड खूप जुने असल्याने काही पेटत्या गोवऱ्या पोकळ झालेल्या खोडात पडल्या. यामुळे झाडाने पेट घेतला. ग्रामस्थांनी ही आग आठ ते दहा पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने विझवली. मात्र, खोडात अद्यापही विस्तव होता, मध्यरात्री वाऱ्यामुळे आग पुन्हा भडकली आणि झाडाने पुन्हा पेट घेतला. काही क्षणातच आगीने पूर्ण झाड कवेत घेतेल. 

पहाटे ४ वाजेच्या दरम्यान काही ग्रामस्थांच्या हे लक्षात आले. यानंतर उपसरपंच तनवीर पटेल, पोलीस पाटील संतोष सातदिवे, चंद्रकांत राहणे यांनी आग विझविण्यासाठी सर्वत्र फोन केले. मात्र, कोणीही दखल घेतली. शेवटी सकाळी औरंगाबाद अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने सकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आली. या झाडाशेजारी अनेक लहानमोठे दुकाने आहेत. आग लवकर आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या चिंचेच्या झाडा जवळून विद्युत तारा गेल्या आहेत. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार केली असून याची दखल घेतली गेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआगenvironmentपर्यावरण