शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

१०० स्मार्ट बस, ४२ हजार रिक्षा; तरी छत्रपती संभाजीनगरातील प्रवासी त्रस्तच

By मुजीब देवणीकर | Updated: December 22, 2023 18:48 IST

प्रशासन नेमके करते काय? सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष

छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. शहरात राहणाऱ्या १८ लाख नागरिकांपैकी बहुतांश नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावाच लागतो. स्मार्ट सिटीच्या १०० बस आहेत. ३२ हजार परवानाधारक रिक्षा, दहा हजार परवाना नसलेल्या रिक्षा, १२०० ई-रिक्षा आहेत. तरीही प्रवाशांना सुलभ सेवा मिळत नाही.

स्मार्ट शहर बससेवाशहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट असेल तर प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे अत्यंत सोपे होते. शासकीय यंत्रणांनी या समस्येकडे कधी गांभीर्याने लक्षच दिले नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्याबोळ झाला आहे. २०१८ मध्ये स्मार्ट सिटीने मोठा गाजावाजा करून १०० बसेस सुरू केल्या. त्यातील ९० बस दररोज धावतात. १८ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. जुन्या शहरात एकही बस फिरकत नाही. बहुतांश बस मोठ्या रस्त्यांवर, शहराबाहेर धावतात. १२० बसथांबे आहेत. करारानुसार बसथांब्यावर ज्या सुविधा प्रवशांना हव्या त्या मिळत नाहीत. स्मार्ट सिटीची बससेवा अनेक भागांत उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी रिक्षांच्या सेवेचा आधार घ्यावा लागतो.

स्मार्ट सिटीचे दु:खस्मार्ट सिटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या शहरातील रस्ते अत्यंत अरुंद असून, बस कोणत्याही रस्त्यांवर सहजपणे ये-जा करू शकत नाही. बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. रस्ते रुंद झाल्याशिवाय बस नेताच येत नाही.

खासगी रिक्षांची संख्यारिक्षा संघटनांच्या माहितीनुसार परवानाधारक रिक्षांची संख्या ३२ हजार, परवाना नसलेले स्क्रॅपमध्ये जातील अशा रिक्षा दहा हजार आहेत. आता त्यात १२०० ई-रिक्षांची भर पडली. यातील ९० टक्के रिक्षा दिवसा, तर १० टक्के रात्री धावतात. शासनाच्या परिवहन समितीने शेअर रिक्षा, प्री-पेड रिक्षांचे दरच ठरवून दिलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची लूट होते. काहीजण अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. अनेकजण प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. सर्वाधिक त्रास शहरात येणाऱ्या पर्यटकांना होतो.

रिक्षाचालकांचे दु:ख१९८५ मध्ये शहरात रिक्षा चालकांना १५० ठिकाणी स्टँड तयार करून देण्यात आले होते. त्यातील ५० ठिकाणी अतिक्रमणे झाली. आणखी १५० स्टँडची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. कंपन्यांचे बसेसही अनेकदा प्रवासी वाहतूक करतात. त्यावर नियंत्रण कोणाचेही नाही.

अनेकदा पाठपुरावा केलारिक्षा संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आरटीओ कार्यालयाकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. प्री-पेड, शेअर रिक्षा सुरू कराव्यात. रिक्षा स्टँड द्यावेत.- निसार अहेमद खान, नेते रिक्षा युनियन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका