शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत १०० टक्के पाऊस; सरासरीच्या तुलनेत ४१ मिमी जास्त बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 11:51 IST

मराठवाड्यातील ८७३ जल प्रकल्पांत सध्या ८० टक्के जलसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ९२ टक्के जलसाठा असून, जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सात जिल्ह्यांत १०० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. फक्त परभणीत जिल्ह्यात ८९ टक्के पाऊस आजवर झाला आहे. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ११७ टक्के पाऊस झाला आहे. सर्वत्र पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. १७ सप्टेंबर रोजी विभागात ४.४ मिलिमीटर पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात ११६ टक्के, जालना ११३ टक्के, बीड ११४ टक्के, लातूर ११०, उस्मानाबाद ११५, नांदेड १३३ टक्के, तर हिंगोलीत ११३ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मिमी आहे. आतापर्यंत ७२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत ८१९ मिमी, म्हणजेच १३३ टक्के पाऊस झाला होता.

जुन, जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सात लाख ३६ हजार १३३.३८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. आता सप्टेंबरमध्ये पावसाचा मुक्काम लांबणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज खरा ठरला तर विभागातील हाताशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे.

८७३ जल प्रकल्पांत ८० टक्के पाणीमराठवाड्यातील ८७३ जल प्रकल्पांत सध्या ८० टक्के जलसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ९२ टक्के जलसाठा असून, जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. ७५ मध्यम प्रकल्पांत ७३ टक्के, ७४७ लघू प्रकल्पांत ४९ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ४९ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांत ६६ टक्के, असा ८० जलसाठा प्रकल्पांत आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद