शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत १०० टक्के पाऊस; सरासरीच्या तुलनेत ४१ मिमी जास्त बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 11:51 IST

मराठवाड्यातील ८७३ जल प्रकल्पांत सध्या ८० टक्के जलसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ९२ टक्के जलसाठा असून, जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सात जिल्ह्यांत १०० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. फक्त परभणीत जिल्ह्यात ८९ टक्के पाऊस आजवर झाला आहे. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ११७ टक्के पाऊस झाला आहे. सर्वत्र पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. १७ सप्टेंबर रोजी विभागात ४.४ मिलिमीटर पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात ११६ टक्के, जालना ११३ टक्के, बीड ११४ टक्के, लातूर ११०, उस्मानाबाद ११५, नांदेड १३३ टक्के, तर हिंगोलीत ११३ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मिमी आहे. आतापर्यंत ७२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत ८१९ मिमी, म्हणजेच १३३ टक्के पाऊस झाला होता.

जुन, जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सात लाख ३६ हजार १३३.३८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. आता सप्टेंबरमध्ये पावसाचा मुक्काम लांबणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज खरा ठरला तर विभागातील हाताशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे.

८७३ जल प्रकल्पांत ८० टक्के पाणीमराठवाड्यातील ८७३ जल प्रकल्पांत सध्या ८० टक्के जलसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ९२ टक्के जलसाठा असून, जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. ७५ मध्यम प्रकल्पांत ७३ टक्के, ७४७ लघू प्रकल्पांत ४९ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ४९ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांत ६६ टक्के, असा ८० जलसाठा प्रकल्पांत आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद