शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

१0 % पाणीपट्टी वाढीला औरंगाबादेत विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:21 IST

समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदारासोबत केलेल्या कराराचे निमित्त दाखवून मागील वर्षी मनपा प्रशासनाने पाणीपट्टीत दहा टक्के वाढ केली होती. यंदाही पुन्हा दहा टक्के दरवाढ १ एप्रिलपासून करण्याचा घाट रचण्यात आला आहे. यावर सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने कडाडून विरोध दर्शविला असून, मागील वर्षी सर्वसाधारण सभेने दरवाढ रद्दचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. येणाºया सर्वसाधारण सभेत दरवाढ रद्द करण्याचा ठराव घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा हटवादीपणा : मागील वर्षीही लादली दरवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदारासोबत केलेल्या कराराचे निमित्त दाखवून मागील वर्षी मनपा प्रशासनाने पाणीपट्टीत दहा टक्के वाढ केली होती. यंदाही पुन्हा दहा टक्के दरवाढ १ एप्रिलपासून करण्याचा घाट रचण्यात आला आहे. यावर सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने कडाडून विरोध दर्शविला असून, मागील वर्षी सर्वसाधारण सभेने दरवाढ रद्दचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. येणाºया सर्वसाधारण सभेत दरवाढ रद्द करण्याचा ठराव घेण्यात येणार आहे.महापालिकेने आॅक्टोबर २०१६ मध्ये समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराची हकालपट्टी केली. कंपनीसोबत केलेला संपूर्ण करारच रद्द करण्यात आला. या कराराच्या उपविधीत दरवर्षी १० टक्के पाणीपट्टीत दरवाढ करण्यास मंजुरी घेण्यात आली आहे. शासनाने या उपविधीला मंजुरी दिली आहे, एवढे एकमेव कारण दाखवून मनपा प्रशासनाने मागील वर्षी औरंगाबादकरांवर दहा टक्के दरवाढ लादली. यंदा १ एप्रिलपासून पुन्हा दहा टक्के वाढ करण्यात येणार आहे. या निर्णयाला सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने कडाडून विरोध दर्शविला आहे.महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन यांनी नमूद केले की, ३६५ दिवसांतून फक्त ६० ते ७० दिवस आपण नागरिकांना पाणी देत आहोत. काही भागांत तीन दिवसाआड, तर काही भागांत पाच दिवसाआड पाणी आहे. पाऊण तास, एक तास नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणी भेटत आहे. औरंगाबादकरांकडे पर्याय नाही, म्हणून मागील अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करीत आहेत.शहरात दोन लाखांहून अधिक नळ कनेक्शन आहेत. महापालिकेच्या रेकॉर्डवर फक्त सव्वा लाख नळ आहेत. रेकॉर्डवर असलेले ४० ते ५० टक्के नागरिक प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतात. महापालिकेने कोणतेही परिश्रम केले नाही, तरी पाणीपट्टी आपोआप जमा होते.अशा नागरिकांवरच दहा टक्के करवाढ लादणार का? असा संतप्त सवालही पदाधिकाºयांनी केला. येणाºया सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी रद्दचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.टँकरचे पाणी आता ४0२ रुपयांनाशहरातील ५० ते ६० गुंठेवारीतील वसाहतींना मागील काही वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. एक दिवसाआड दोन ड्रम पाणी या नागरिकांना देण्यात येते.एका नागरिकाकडून महिना ३६६ रुपये सध्या घेण्यात येत आहेत. यात दहा टक्के वाढ करून ४०२ रुपये वसूल करण्याचा घाट प्रशासनाने रचला आहे.कंत्राटदार का बदलला?समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी कंत्राटदार होते. कंपनीसोबत करार रद्द केल्यानंतर महापालिकेने कंपनीचे ठेकेदार काढून आपल्या मर्जीतील कंत्राटदार नेमले. ही प्रक्रिया महापालिकेने कोणत्या आधारावर केली? या प्रकरणात उपविधींचा भंग होत नाही का? जिथे तिथे सोयीचा अर्थ काढून अधिकारी मोकळे होत आहेत.