शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

१0 % पाणीपट्टी वाढीला औरंगाबादेत विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:21 IST

समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदारासोबत केलेल्या कराराचे निमित्त दाखवून मागील वर्षी मनपा प्रशासनाने पाणीपट्टीत दहा टक्के वाढ केली होती. यंदाही पुन्हा दहा टक्के दरवाढ १ एप्रिलपासून करण्याचा घाट रचण्यात आला आहे. यावर सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने कडाडून विरोध दर्शविला असून, मागील वर्षी सर्वसाधारण सभेने दरवाढ रद्दचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. येणाºया सर्वसाधारण सभेत दरवाढ रद्द करण्याचा ठराव घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा हटवादीपणा : मागील वर्षीही लादली दरवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदारासोबत केलेल्या कराराचे निमित्त दाखवून मागील वर्षी मनपा प्रशासनाने पाणीपट्टीत दहा टक्के वाढ केली होती. यंदाही पुन्हा दहा टक्के दरवाढ १ एप्रिलपासून करण्याचा घाट रचण्यात आला आहे. यावर सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने कडाडून विरोध दर्शविला असून, मागील वर्षी सर्वसाधारण सभेने दरवाढ रद्दचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. येणाºया सर्वसाधारण सभेत दरवाढ रद्द करण्याचा ठराव घेण्यात येणार आहे.महापालिकेने आॅक्टोबर २०१६ मध्ये समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराची हकालपट्टी केली. कंपनीसोबत केलेला संपूर्ण करारच रद्द करण्यात आला. या कराराच्या उपविधीत दरवर्षी १० टक्के पाणीपट्टीत दरवाढ करण्यास मंजुरी घेण्यात आली आहे. शासनाने या उपविधीला मंजुरी दिली आहे, एवढे एकमेव कारण दाखवून मनपा प्रशासनाने मागील वर्षी औरंगाबादकरांवर दहा टक्के दरवाढ लादली. यंदा १ एप्रिलपासून पुन्हा दहा टक्के वाढ करण्यात येणार आहे. या निर्णयाला सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने कडाडून विरोध दर्शविला आहे.महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन यांनी नमूद केले की, ३६५ दिवसांतून फक्त ६० ते ७० दिवस आपण नागरिकांना पाणी देत आहोत. काही भागांत तीन दिवसाआड, तर काही भागांत पाच दिवसाआड पाणी आहे. पाऊण तास, एक तास नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणी भेटत आहे. औरंगाबादकरांकडे पर्याय नाही, म्हणून मागील अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करीत आहेत.शहरात दोन लाखांहून अधिक नळ कनेक्शन आहेत. महापालिकेच्या रेकॉर्डवर फक्त सव्वा लाख नळ आहेत. रेकॉर्डवर असलेले ४० ते ५० टक्के नागरिक प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतात. महापालिकेने कोणतेही परिश्रम केले नाही, तरी पाणीपट्टी आपोआप जमा होते.अशा नागरिकांवरच दहा टक्के करवाढ लादणार का? असा संतप्त सवालही पदाधिकाºयांनी केला. येणाºया सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी रद्दचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.टँकरचे पाणी आता ४0२ रुपयांनाशहरातील ५० ते ६० गुंठेवारीतील वसाहतींना मागील काही वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. एक दिवसाआड दोन ड्रम पाणी या नागरिकांना देण्यात येते.एका नागरिकाकडून महिना ३६६ रुपये सध्या घेण्यात येत आहेत. यात दहा टक्के वाढ करून ४०२ रुपये वसूल करण्याचा घाट प्रशासनाने रचला आहे.कंत्राटदार का बदलला?समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी कंत्राटदार होते. कंपनीसोबत करार रद्द केल्यानंतर महापालिकेने कंपनीचे ठेकेदार काढून आपल्या मर्जीतील कंत्राटदार नेमले. ही प्रक्रिया महापालिकेने कोणत्या आधारावर केली? या प्रकरणात उपविधींचा भंग होत नाही का? जिथे तिथे सोयीचा अर्थ काढून अधिकारी मोकळे होत आहेत.