शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:45 PM

औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षांत ‘एमआयडीसी’ने १७५ भूखंडांचे वाटप केले.

औरंगाबाद : औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षांत ‘एमआयडीसी’ने १७५ भूखंडांचे वाटप केले. त्यातून २५४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागांमुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्र ठरणार आहे.

एमआयडीसी’ने २०१५ ते २०१८ या कालावधीत १७५ भूखंडांचे वाटप केले आहे. यामध्ये सर्वाधिक भूखंड हे २०१६ मध्ये वाटप झाले. तर भूखंड वाटपातून सर्वाधिक गुंतवणूक ही २०१७ मध्ये १५६ कोटी रुपयांची झाली आहे. २०१८ या वर्षात आतापर्यंत ४३ भूखंड वाटप करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औरंगाबाद  प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. चार वर्षांत ‘एमआयडीसी’तर्फे आॅनलाईन आणि ई-बिडिंगद्वारे हे भूखंड वाटप झाले आहेत. 

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ‘डीएमआयसी’अंतर्गत  स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीची उभारणी गतीने सुरू आहे. ‘एमआयडीसी’क डे आजघडीला उद्योगांसाठी औरंगाबाद परिसरातील लाडगाव, करमाड, पैठण, बिडकीन याठिकाणी सुमारे १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. कन्नड, सटाणा, जयपूर, गेवराई, अतिरिक्त जालना टप्पा-४ येथील औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी आणखी जागा उपलब्ध होणार आहे. 

मुंबई, पुण्यासह अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये मागणी अधिक आणि जागा कमी, अशी अवस्था आहे. आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागेमुळे औरंगाबादकडे उद्योगांचा ओढा वाढत आहे. देश-विदेशातील कंपन्या गुंतवणुकीसाठी रुची दर्शवीत आहेत. औरंगाबादेत कार्यरत उद्योगही नवीन जागा घेऊन उद्योगांचा विस्तार करण्यास प्राधान्य देत आहेत.

३,७९३ जणांना रोजगारचार वर्षांत झालेल्या भूखंड वाटपातून सुमारे ३ हजार ७९३ जणांच्या रोजगार निर्मितीला चालना मिळाली. यामध्ये २०१५ मध्ये भूखंड घेतलेल्या अनेकांचे उद्योग सुरू झाले. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्धही झाले. २०१७, २०१८ या वर्षात भूखंड घेतलेल्यांची उद्योग उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यातून आगामी कालावधीत रोजगार वाढेल.

औरंगाबादकडे वाढता कल मुंबई, पुणे याठिकाणी जागा कमी असल्याने औरंगाबादकडे उद्योगांचा कल वाढत आहे. शहर परिसरात १० हजार एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्रबिंदू ठरत आहे.-सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

टॅग्स :MIDCएमआयडीसीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरShendra MIDCशेंद्रा एमआयडीसीChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसी