शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

२७ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर निवृत्तांना प्रत्येकी १० लाख भरपायी; वनमजुरांच्या संघर्षाचे फलित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:24 IST

सदर कामगार १९९६ आणि २०१२ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करीत नसल्याच्या कारणावरून शासनाने प्रस्ताव फेटाळले.

छत्रपती संभाजीनगर : सुमारे तीन दशके सेवा बजावलेल्या याचिकाकर्त्यांना अथवा त्यांच्या वारसांना निवृत्तीनंतर देय असलेले आर्थिक लाभ दिले नसल्यास, त्या लाभांऐवजी प्रत्येकी एकरकमी १० लाख रुपये भरपायी द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी वनविभागास दिला.

याचिककर्त्यांनी सलग २४० दिवस सेवा बजावली नसल्यामुळे आणि काही याचिकाकर्ते रोजगार हमी योजनेतील कामगार असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करून त्यांना आर्थिक लाभ देण्यास नकार दिला. यामुळे दाखल याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

भागवत पाटील व इतर वनमजुरांनी ॲड. बी. ए. दरक (धोंडराईकर) यांच्यामार्फत स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी नाशिक आणि जळगाव येथील औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांच्या तक्रारी अंशत: मंजूर करून वनखात्याने ‘अनुचित कामगार प्रथेचा’ अवलंब केल्याचा निष्कर्ष काढला. तक्रारदारांना ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वावर आर्थिक लाभ देण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध वनविभागाने खंडपीठात याचिका दाखल केली. सामाजिक वनीकरण हा उद्योग असल्याचा आणि अर्जदार रोजगार हमी योजनेचे कामगार असल्याचे वनविभाग सिद्ध करू शकला नसल्याचा निर्वाळा दिला. त्यांच्या सेवा नियमित करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा आदेश दिला होता; परंतु सदर कामगार १९९६ आणि २०१२ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करीत नसल्याच्या कारणावरून शासनाने प्रस्ताव फेटाळले.

त्या नाराजीने कामगारांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या. खंडपीठाने नाना पवार यांना ७ लाख ५० हजार आणि इतरांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. या आदेशाच्या बजावणीत व रक्कम अदा करण्यात आचारसंहितेची बाधा येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ