शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२७ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर निवृत्तांना प्रत्येकी १० लाख भरपायी; वनमजुरांच्या संघर्षाचे फलित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:24 IST

सदर कामगार १९९६ आणि २०१२ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करीत नसल्याच्या कारणावरून शासनाने प्रस्ताव फेटाळले.

छत्रपती संभाजीनगर : सुमारे तीन दशके सेवा बजावलेल्या याचिकाकर्त्यांना अथवा त्यांच्या वारसांना निवृत्तीनंतर देय असलेले आर्थिक लाभ दिले नसल्यास, त्या लाभांऐवजी प्रत्येकी एकरकमी १० लाख रुपये भरपायी द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी वनविभागास दिला.

याचिककर्त्यांनी सलग २४० दिवस सेवा बजावली नसल्यामुळे आणि काही याचिकाकर्ते रोजगार हमी योजनेतील कामगार असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करून त्यांना आर्थिक लाभ देण्यास नकार दिला. यामुळे दाखल याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

भागवत पाटील व इतर वनमजुरांनी ॲड. बी. ए. दरक (धोंडराईकर) यांच्यामार्फत स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी नाशिक आणि जळगाव येथील औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांच्या तक्रारी अंशत: मंजूर करून वनखात्याने ‘अनुचित कामगार प्रथेचा’ अवलंब केल्याचा निष्कर्ष काढला. तक्रारदारांना ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वावर आर्थिक लाभ देण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध वनविभागाने खंडपीठात याचिका दाखल केली. सामाजिक वनीकरण हा उद्योग असल्याचा आणि अर्जदार रोजगार हमी योजनेचे कामगार असल्याचे वनविभाग सिद्ध करू शकला नसल्याचा निर्वाळा दिला. त्यांच्या सेवा नियमित करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा आदेश दिला होता; परंतु सदर कामगार १९९६ आणि २०१२ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करीत नसल्याच्या कारणावरून शासनाने प्रस्ताव फेटाळले.

त्या नाराजीने कामगारांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या. खंडपीठाने नाना पवार यांना ७ लाख ५० हजार आणि इतरांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. या आदेशाच्या बजावणीत व रक्कम अदा करण्यात आचारसंहितेची बाधा येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ