शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महापालिकेला नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ६८ कोटी प्राप्त

By मुजीब देवणीकर | Updated: February 1, 2024 19:35 IST

शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने सोमवारी महापालिकेला तब्बल १ हजार ६८ कोटींचा निधी दिला. त्यामुळे मार्च २०२४ पर्यंत योजनेसाठी निधीची कमतरता भासणार नाही. आतापर्यंत झालेल्या कामांचे बिल देण्यासाठी मनपाने शासनाकडे ८११ कोटींची मागणी केली होती. त्या तुलनेत राज्याने २०० कोटी अतिरिक्त निधी दिला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत केंद्र शासनाचे ३० टक्के, राज्याचे ४५, तर महापालिकेने ३० टक्के वाटा द्यावा, असे ठरले आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य शासनाने मिळून योजनेसाठी आतापर्यंत ७३९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी महापालिकेला दिला. हा निधी मनपाने त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पाठविला आहे. महापालिकेकडे समांतर पाणी जलवाहिनीचा २०० कोटींचा निधी पडून होता. हा निधीही वापरला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महापालिकेने आत्तापर्यंत ९८१ कोटी ६५ लाख रुपये दिले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे ८११ कोटी निधीची मागणी केली होती. प्रशासक जी. श्रीकांत यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन ८११ कोटींच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने सोमवारी महापालिकेला १ हजार ६८ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. महापालिकेने मागणी केली त्यापेक्षा २०० कोटी रुपयांचा निधी जास्त देण्यात आला. त्यामुळे मार्च-एप्रिलपर्यंत कामासाठी निधी कमी पडणार नाही.

८२२ कोटी २२ लाखांचा प्रश्न कायमनवीन पाणीपुरवठा योजनेत मनपाला ८२२ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे. खंडपीठाने हा वाटा राज्य शासनाने द्यावा, असे आदेशित केले आहे. ८२२ कोटींचा निधी देण्यासंदर्भात राज्य शासनाने अद्याप हमी दिलेली नाही. सोमवारी मागणीपेक्षा २०० कोटी रुपये जास्तीचे देण्यात आल्यामुळे शासन महापालिकेच्या वाट्याचा निधी देईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका