शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

महापालिकेला नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ६८ कोटी प्राप्त

By मुजीब देवणीकर | Updated: February 1, 2024 19:35 IST

शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने सोमवारी महापालिकेला तब्बल १ हजार ६८ कोटींचा निधी दिला. त्यामुळे मार्च २०२४ पर्यंत योजनेसाठी निधीची कमतरता भासणार नाही. आतापर्यंत झालेल्या कामांचे बिल देण्यासाठी मनपाने शासनाकडे ८११ कोटींची मागणी केली होती. त्या तुलनेत राज्याने २०० कोटी अतिरिक्त निधी दिला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत केंद्र शासनाचे ३० टक्के, राज्याचे ४५, तर महापालिकेने ३० टक्के वाटा द्यावा, असे ठरले आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य शासनाने मिळून योजनेसाठी आतापर्यंत ७३९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी महापालिकेला दिला. हा निधी मनपाने त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पाठविला आहे. महापालिकेकडे समांतर पाणी जलवाहिनीचा २०० कोटींचा निधी पडून होता. हा निधीही वापरला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महापालिकेने आत्तापर्यंत ९८१ कोटी ६५ लाख रुपये दिले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे ८११ कोटी निधीची मागणी केली होती. प्रशासक जी. श्रीकांत यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन ८११ कोटींच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने सोमवारी महापालिकेला १ हजार ६८ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. महापालिकेने मागणी केली त्यापेक्षा २०० कोटी रुपयांचा निधी जास्त देण्यात आला. त्यामुळे मार्च-एप्रिलपर्यंत कामासाठी निधी कमी पडणार नाही.

८२२ कोटी २२ लाखांचा प्रश्न कायमनवीन पाणीपुरवठा योजनेत मनपाला ८२२ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे. खंडपीठाने हा वाटा राज्य शासनाने द्यावा, असे आदेशित केले आहे. ८२२ कोटींचा निधी देण्यासंदर्भात राज्य शासनाने अद्याप हमी दिलेली नाही. सोमवारी मागणीपेक्षा २०० कोटी रुपये जास्तीचे देण्यात आल्यामुळे शासन महापालिकेच्या वाट्याचा निधी देईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका