शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ६८ कोटी प्राप्त

By मुजीब देवणीकर | Updated: February 1, 2024 19:35 IST

शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने सोमवारी महापालिकेला तब्बल १ हजार ६८ कोटींचा निधी दिला. त्यामुळे मार्च २०२४ पर्यंत योजनेसाठी निधीची कमतरता भासणार नाही. आतापर्यंत झालेल्या कामांचे बिल देण्यासाठी मनपाने शासनाकडे ८११ कोटींची मागणी केली होती. त्या तुलनेत राज्याने २०० कोटी अतिरिक्त निधी दिला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत केंद्र शासनाचे ३० टक्के, राज्याचे ४५, तर महापालिकेने ३० टक्के वाटा द्यावा, असे ठरले आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य शासनाने मिळून योजनेसाठी आतापर्यंत ७३९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी महापालिकेला दिला. हा निधी मनपाने त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पाठविला आहे. महापालिकेकडे समांतर पाणी जलवाहिनीचा २०० कोटींचा निधी पडून होता. हा निधीही वापरला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महापालिकेने आत्तापर्यंत ९८१ कोटी ६५ लाख रुपये दिले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे ८११ कोटी निधीची मागणी केली होती. प्रशासक जी. श्रीकांत यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन ८११ कोटींच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने सोमवारी महापालिकेला १ हजार ६८ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. महापालिकेने मागणी केली त्यापेक्षा २०० कोटी रुपयांचा निधी जास्त देण्यात आला. त्यामुळे मार्च-एप्रिलपर्यंत कामासाठी निधी कमी पडणार नाही.

८२२ कोटी २२ लाखांचा प्रश्न कायमनवीन पाणीपुरवठा योजनेत मनपाला ८२२ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे. खंडपीठाने हा वाटा राज्य शासनाने द्यावा, असे आदेशित केले आहे. ८२२ कोटींचा निधी देण्यासंदर्भात राज्य शासनाने अद्याप हमी दिलेली नाही. सोमवारी मागणीपेक्षा २०० कोटी रुपये जास्तीचे देण्यात आल्यामुळे शासन महापालिकेच्या वाट्याचा निधी देईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका