शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसाळ्यात १२५ टँकरने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:50 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन एमआयडीसीच्या जलकुंभावरुन या टंचाईग्रस्त गावात दररोज १२५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाईचे संकट कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन एमआयडीसीच्या जलकुंभावरुन या टंचाईग्रस्त गावात दररोज १२५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जिल्ह्यात बहुतांश तलाव व जलसिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. नाशिक-नगर परिसरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प ९० टक्के भरला असला तरी या पाण्याचा उपयोग उद्योग व शहरातील पाणी पुरवठ्यासाठी गेला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनला आहे.

गंगापूर, खुलताबाद व जिल्ह्यातील इतर ठिकाणी नागरिकांना पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात जायकवाडी धरण मृत साठ्यात गेल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली होती. तीन आठवड्यांपूर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी जलाशयात साठा झाला आहे.

मात्र, दुसरीकडे अत्यल्प पावसामुळे गंगापूर, खुलताबाद तसेच जिल्ह्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यानंतर एमआयडीसी प्रशासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरवात केल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता प्रशांत सरग यांनी दिली.

या टंचाईग्रस्त गावांत टँकरभीषण पाणीटंचाई असलेल्या वाळूज परिसरातील एकलहेरा, नांदेडा, टाकळी कदीम,पोळ रांजणगाव बरोबर गंगापूर तालुक्यातील जिकठाण, मिर्झापुर, सुलतानाबाद, बाभुळगाव, आगाठाण, भागाठाण, पाच पीरवाडी, कोळघर, डोमेगाव, प्रतापपूर,दहेगाव, बोरगाव आदीसह जिल्ह्यात इतर टंचाईग्रस्त गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी