शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

भरपावसाळ्यात १२५ टँकरने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:50 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन एमआयडीसीच्या जलकुंभावरुन या टंचाईग्रस्त गावात दररोज १२५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाईचे संकट कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन एमआयडीसीच्या जलकुंभावरुन या टंचाईग्रस्त गावात दररोज १२५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जिल्ह्यात बहुतांश तलाव व जलसिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. नाशिक-नगर परिसरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प ९० टक्के भरला असला तरी या पाण्याचा उपयोग उद्योग व शहरातील पाणी पुरवठ्यासाठी गेला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनला आहे.

गंगापूर, खुलताबाद व जिल्ह्यातील इतर ठिकाणी नागरिकांना पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात जायकवाडी धरण मृत साठ्यात गेल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली होती. तीन आठवड्यांपूर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी जलाशयात साठा झाला आहे.

मात्र, दुसरीकडे अत्यल्प पावसामुळे गंगापूर, खुलताबाद तसेच जिल्ह्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यानंतर एमआयडीसी प्रशासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरवात केल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता प्रशांत सरग यांनी दिली.

या टंचाईग्रस्त गावांत टँकरभीषण पाणीटंचाई असलेल्या वाळूज परिसरातील एकलहेरा, नांदेडा, टाकळी कदीम,पोळ रांजणगाव बरोबर गंगापूर तालुक्यातील जिकठाण, मिर्झापुर, सुलतानाबाद, बाभुळगाव, आगाठाण, भागाठाण, पाच पीरवाडी, कोळघर, डोमेगाव, प्रतापपूर,दहेगाव, बोरगाव आदीसह जिल्ह्यात इतर टंचाईग्रस्त गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी