शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भरपावसाळ्यात १२५ टँकरने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:50 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन एमआयडीसीच्या जलकुंभावरुन या टंचाईग्रस्त गावात दररोज १२५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाईचे संकट कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन एमआयडीसीच्या जलकुंभावरुन या टंचाईग्रस्त गावात दररोज १२५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जिल्ह्यात बहुतांश तलाव व जलसिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. नाशिक-नगर परिसरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प ९० टक्के भरला असला तरी या पाण्याचा उपयोग उद्योग व शहरातील पाणी पुरवठ्यासाठी गेला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनला आहे.

गंगापूर, खुलताबाद व जिल्ह्यातील इतर ठिकाणी नागरिकांना पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात जायकवाडी धरण मृत साठ्यात गेल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली होती. तीन आठवड्यांपूर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी जलाशयात साठा झाला आहे.

मात्र, दुसरीकडे अत्यल्प पावसामुळे गंगापूर, खुलताबाद तसेच जिल्ह्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यानंतर एमआयडीसी प्रशासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरवात केल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता प्रशांत सरग यांनी दिली.

या टंचाईग्रस्त गावांत टँकरभीषण पाणीटंचाई असलेल्या वाळूज परिसरातील एकलहेरा, नांदेडा, टाकळी कदीम,पोळ रांजणगाव बरोबर गंगापूर तालुक्यातील जिकठाण, मिर्झापुर, सुलतानाबाद, बाभुळगाव, आगाठाण, भागाठाण, पाच पीरवाडी, कोळघर, डोमेगाव, प्रतापपूर,दहेगाव, बोरगाव आदीसह जिल्ह्यात इतर टंचाईग्रस्त गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी