शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अबब बेरोजगारांना नोकरी अर्जांसाठीच लागणार १ लाख ३६ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:21 IST

राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टलमार्फत जि. प. मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहे. यातील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. एक बेरोजगार जि.प.मधील भरण्यात येत असलेल्या एकूण आठही पदासाठी पात्र असेल तर त्यास प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देजि.प. भरती प्रक्रियेतील परीक्षा शुल्क : २४ आॅगस्ट २०१७ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा

औरंगाबाद : राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टलमार्फत जि. प. मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहे. यातील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. एक बेरोजगार जि.प.मधील भरण्यात येत असलेल्या एकूण आठही पदासाठी पात्र असेल तर त्यास प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यातील ३४ जि.प.मधील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज केल्यास एका बेरोजगार युवकाला परीक्षेसाठी तब्बल १ लाख ३६ हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागेल. याविरोधात डी.टी.एड., बी. एड. स्टुडंट असोसिएशनने दंड थोपाटले आहेत.औरंगाबाद जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि.१२) निवेदन देण्यात आले. जि.प.भरती प्रक्रियेतील परीक्षा शुल्काच्या नावाखाली सुरू असलेल्या अन्याय्य लुटीच्या विरोधात आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शासनाने २४ आॅगस्ट २०१७ रोजी जि.प.मधील वर्ग- ३ व वर्ग- ४ च्या पद भरतीसंदर्भात शासन निर्णय काढला होता. या शासन निर्णयानुसार राज्यातील ३४ जि.प. मध्ये एकूण आठ पदांसाठी नोकरभरती करण्यात येत आहे. या नोकरभरतीसाठी प्रत्येक पदाला स्वतंत्र अर्ज करावा लागत असून, त्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. एका जि.प.मधील आठ पदांसाठी ४ हजार रुपये मोजावे लागतील. राज्यातील सर्वच जि.प.मधील प्रत्येक आठ पदांसाठी स्वतंत्र अर्ज केल्यास १ लाख ३६ हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागेल. तसेच राज्यातील ३४ जि.प.मधील एकाच पदासाठी अर्ज केल्यास बेरोजगाराला १७ हजार रुपये एवढे शुल्क लागणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.शासनाने २४ आॅगस्ट २०१७ रोजी निर्गमित केलेल्या एका शासन निर्णयानुसार जि.प.मधील वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्यात येते. मात्र प्रत्येक जि.प.साठी उमेदवार पसंतीक्रम देऊ शकतो. पसंतीक्रम दिल्यामुळे बेरोजगारांची होणारी अतिरिक्त लूट थांबली जाऊ शकते. त्यामुळे या शासन निर्णयानुसारच जि.प.मधील पदांच्या भरतीसाठी परीक्षा शुल्काची आकारणी करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जि.प.मधील पदांच्या भरतीसाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यापूर्वी ही अन्याय्य अट दूर न केल्यास मराठवाड्यातील हजारो बेरोजगारांना पैशांअभावी नोकरीची संधी मिळणार नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर श्रीधर मगर, दिगंबर वैद्य, अक्षय येर, ऋषिकेश कवीमंडन, प्रतीक म्हस्के, प्रवीण कुलकर्णी यांच्या स्वाक्षºया आहेत.चौकटया पदांची होत आहे भरतीराज्यातील ३४ जि.प.मधील वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील आठ पदांची भरती महाभरती पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. यात सिनिअर असिस्टंट (अकाऊंटंट), हेल्थ वर्क (मेल), ज्युनिअर असिस्टंट, एक्सटेन्शन आॅफिसर, ज्युनिअर अकाऊंट आॅफिसर, हेल्थ वर्कर (मेल सेंनोल स्प्रायिंग) या पदांचा समावेश आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारी