शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

झेडपी कर्मचाऱ्यांची वाताहत थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 5:00 AM

जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त्यामुळे अनेकांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्ष सेवा करूनही आपली ही अवस्था बघून अनेकांना पश्चाताप सुद्धा होताे.

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २५ ते ३० वर्षे सेवा करूनही जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या कार्यालयात सेवा केली त्याच कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर येते. असे अनेक प्रकार आजपर्यंत घडले आहे. आता मात्र कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात सर्व लाभांसह त्यांचा सत्कार करण्याचे आदेश सीईओंनी विभागप्रमुखांना दिले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त्यामुळे अनेकांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्ष सेवा करूनही आपली ही अवस्था बघून अनेकांना पश्चाताप सुद्धा होताे. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी सीईओ डाॅ. मिताली सेठी यांनी सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुखांना एक पत्र पाठविले असून सेवानिवृत्ती लाभासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा त्याच महिन्याच्या शेवटी सत्कार करण्याचे म्हटले आहे.  यामुळे यापुढे तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर लाभ मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियममहाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम १९८२ नुसार कर्मचारी सेवेतून नियत वयोमान सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, कुटूंब निवृत्ती वेतन, वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्ती, सक्तीने सेवानिवृत्ती इ. सर्व प्रकरणे, सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ अदा करणे गरजेचे आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे सेवानिवृत्तीचे दिवशी आर्थिक लाभाचे धनादेश त्याच दिवशी सन्मानपूर्वक वितरित करणे आवश्यक आहे.

दर महिन्याच्या शेवटी  होणार सत्कार- सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकवेळा कर्मचाऱ्यांचा साधा सत्कार केला जात नाही. एवढेच नाही तर सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ सुद्धा वेळेवर दिल्या जात नाही. त्यामुळे अनेकवेळा कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता वेळेवर लाभ तसेच सेवानिवृत्तीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा सत्कारसुद्धा केला जाणार आहे.

उंबरठे झिजवणे होणार बंदएकदा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन, गटविमा, उपदान, भविष्य निर्वाहनिधी आदी महत्त्वाचे लाभ देण्यास बराच उशीर होताे. त्यामुळे अनेकवेळा चकरा माराव्या लागतात. आता मात्र सीईओंच्या आदेशानंतर किमान कर्मचाऱ्यांच्या चकरा कमी होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद