शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्नावर जिल्हा परिषदेत वादळ

By admin | Updated: May 26, 2017 00:13 IST

सध्या तीव्र उन्हामुळे अनेक गावांत पाणी टंचाईची झळ निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत

विरोधकांनी मडके फोडले : सत्ताधाऱ्यांकडून मोघम उत्तरे मिळत असल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या तीव्र उन्हामुळे अनेक गावांत पाणी टंचाईची झळ निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. बुधवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत विरोधकांनी पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना घेरले. मात्र सत्ताधाऱ्यांनी केवळ मोघम उत्तरे देऊन सभा चालविण्याचा प्रयत्न केला. यावर रोष व्यक्त करीत विरोधकांनी सभेचे प्रोसेडिंग फाडले, प्रवेशद्वारावर मडके फोडले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आणि सभा केवळ १६ मिनिटात गुंडाळावी लागली. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शेकडो हातपंपही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी हाहाकार मचला आहे. मिळेल त्या पाणी स्त्रोताद्वारे गावकरी पाणी घेत आहेत. मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. पाणी प्रश्नावर सभा घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. तसे पत्र २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र तब्बल २९ दिवसांनी पाणी प्रश्नावर सभा घेण्यात आली. सभेच्या प्रारंभीच जिल्ह्यातील किती हातपंप बंद आहेत, याबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा ९ हजार ७५० हातपंपापैकी ७ हजार ७८८ सुरू तर केवळ ९४ हातपंप बंद असल्याचे सांगण्यात आले. किती गावातील नागरिक फ्लोराईडयुक्त पाणी पितात व बंद हातपंपाची माहिती विरोधकांनी मागितली. मात्र सत्ताधाऱ्यांनी गावांची माहिती देण्यास नकार देत मोघम उत्तरे देत सभा चालविण्याचा प्रयत्न केला. अन्य प्रश्नावरही असाच प्रकार सुरू होता. त्यामुळे विरोधक संतापून गेले व सभेचे प्रोसेडिंग फाडून प्रवेशद्वारावर सत्ताधाऱ्यांविरूद्ध घोषणा देत मडके फोडले. यावेळी काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, खेमराज मरस्कोल्हे, गोपाल दडमल, डॉ. आसावरी देवतळे, काळे, पारखी, शेरकी, ममता डुकरे, नैना गेडाम, जीवतोडे, रमाकांत लोधे आदी उपस्थित होते. पाणी प्रश्नावर सत्ताधारी किती तत्पर हे विशेष सभेवरून दिसून आले आहे. सत्ताधारी कमिशन असलेल्या कामाकडे लक्ष देत असून याविरूद्ध आंदोलन करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. पाणी पुरवठा विभागात भ्रष्टाचार : सतीश वारजूकर पाणी प्रश्नावर लक्ष देण्यासाठी जि. प. अध्यक्षांना पत्र देऊन सभा घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र अध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष करून तब्बल २९ दिवसांनी सभा बोलाविली. विशेष सभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर केवळ मोघम उत्तरे देण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. हातपंप, पाणी पुरवठा योजना बंद असून नागरिकांची होरपळ सुरू आहे. सन २०१६-१७ मध्ये पाणी पुरवठा विभागाकडून योजनांच्या दुरूस्तीच्या कामावर ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र या कामांचा कोणताच फायदा गावकऱ्यांना झालेला नाही. पाणी पुरवठा विभागातील सदर भष्ट्राचार लपविण्यासाठीच अध्यक्षांनी पाणी प्रश्नावरील विशेष सभा केवळ १५ मिनिटात गुंडाळली, असा आरोप काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी केला आहे. अध्यक्षांच्याच गावात पाणी टंचाई असून सत्ताधारी सत्तेच्या अविर्भावात वागत असून त्यांना ग्रामीण विकासाशी काहीही देणे घेणे नसल्यानेच पाणी समस्या बिकट झाल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला आहे. विरोधकांना विकासाशी देणे-घेणे नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. जिल्ह्यातील एकही गाव टंचाईग्रस्त राहू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात विरोधकांना स्वारस्य नाही. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. पाणी पुरवठा योजनांच्या कामावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसून विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. - देवराव भोंगळे जि. प. अध्यक्ष, चंद्रपूर.