शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे राजकारण बदलणार; 6 जागा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

चंद्रपूर जि.प. मध्ये ६ आणि पंचायत समित्यांमध्ये १२ जागांची वाढ झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश दिला. या प्रक्रियेला विलंब लागणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांच्या नजरा निवडणूक तारखेकडे लागल्या आहेत. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाअभावी निवडणुका घेणे टाळले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत अधिनियम १९६१ मधील कलम ९ अंतर्गत राज्य सरकारने दुरुस्ती करून जि.प. तसेच पंचायत समितीच्या जागा वाढविल्या. चंद्रपूर जि.प. मध्ये ६ आणि पंचायत समित्यांमध्ये १२ जागांची वाढ झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश दिला. या प्रक्रियेला विलंब लागणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांच्या नजरा निवडणूक तारखेकडे लागल्या आहेत.राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाअभावी निवडणुका घेणे टाळले. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. सध्या तरी याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायतींचा कालावधी संपला. त्यामुळे सध्या प्रशासकराज सुरू आहे. चंद्रपूर जि.प.चा कारभारही प्रशासकच हाकत आहेत. यापूर्वी ५६ जि.प. सदस्य होते. नव्या दुरुस्तीनुसार ६ जागा वाढून त्या आता ६२ झाल्या आहेत. या वाढीव जागांसाठी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत.

सदस्य ५६ वरुन ६२वर

चंद्रपूर जिल्हा परिषदेत यापूर्वी ५६ गट होते. अधिनियम दुरुस्तीमुळे ६ जागांची भर पडून ६२ गट झाले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनाने गट व गणांची पुनर्रचना केली होती. मान्यता मिळाल्याने राज्य सरकारने अधिसूचना जारी केली.

जिल्हा परिषदेवर प्रशासकराजभाजपने दोन टर्म जिल्हा परिषदेवर राज्य केले. या दोन्ही टर्ममध्ये भाजपचा जणू एकछत्री अंमल होता. मुदत संपल्याने सध्या प्रशासकराज सुरू आहे. आगामी निवडणुकीत भाजपचे पुनरागमन होते की, महाराष्ट्र विकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस जि. मध्ये एन्ट्री करते, हे निवडणुकीनंतरच कळेल.

पंचायत समिती गणांतही जोरदार हालचाली- चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये यापूर्वी ११२ गण होते. त्यामध्ये १२ गणांची वाढ झाली. - या वाढीव जागांवर नजर ठेवून सर्वच पक्षांचे इच्छुक कामाला लागल्याचे दिसून येत आहे. 

लोकप्रतिनिधी म्हणतात...

गट-गणांवर आक्षेप व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षण सोडत होईल. त्यावरही हरकती येतील. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर जाऊ शकते.- संजय गजपुरे, माजी जि. प. सदस्य, नागभीड

जि.प. गट आणि पं.स. गणांची संख्या वाढवल्याने इच्छुकांमध्ये चुरस वाढेल. त्या भागाला प्रतिनिधित्व मिळणार असल्याने तेथील समस्या प्रशासनासमोर येतील. या समस्यांचा निपटारा होईल. सरकारचा निर्णय योग्यच आहे.- नंदु नागरकर, माजी शहर अध्यक्ष कॉंग्रेस, चंद्रपूर

नव्या नेतृत्वाला संधी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सादर करण्याचा आदेश सरकारला दिला. या प्रक्रियेला विलंब लागेल, अशी शक्यता आहे. वाढीव गट व गणांमुळे नव्या नेतृत्वाला संधी मिळेल. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती