शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्यातून जिंकता येते जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:05 IST

अत्याधुनिक शस्त्रांच्या आधारावर युद्धाच्या माध्यमातून जगाला जिंकले शक्य नाही. जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला केवळ कौशल्याच्या आधारे जिंकता येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याधारित विविध योजना सुरू केल्या आहे.

ठळक मुद्देकौशल्यातून जिंकता येते जग

xलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अत्याधुनिक शस्त्रांच्या आधारावर युद्धाच्या माध्यमातून जगाला जिंकले शक्य नाही. जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला केवळ कौशल्याच्या आधारे जिंकता येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याधारित विविध योजना सुरू केल्या आहे. युवकांनी योजनांचा लाभ घेऊन प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सोमवारी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा नियोजन अधिकारी नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक भय्याजी येरमे, उद्योजकता विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते.ना. मुनगंटीवार म्हणाले, १७५० मध्ये जगाच्या एकूण उत्पन्नापैकी एकट्या भारताचे उत्पन्न ५० टक्के होते. परंतु आज गरजेच्या अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात. युवकांना स्वत:चे कौशल्य ओळखता आले नाही. आजही देश निर्मिती व निर्यातीमध्ये मागे आहे. युवकांमध्ये शक्ती आहे. परंतु त्या शक्तीला कौशल्याची जोड देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील युवकांनी योजनांचा लाभ घेऊन कौशल्य निर्माण करावे, स्वत:सोबत देशाचाही विकास साधावा, असेही त्यांनी नमुद केले. युवकांमध्ये कौशल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योजकता निर्माण होण्याकरिता निधीची तरतूद केली आहे. पोंभूर्णा येथे अगरबत्ती व टूथपिक निर्मितीचा उद्योग व सैनिकी शाळेची उभारणी केली.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक बाबींसाठी केल्यास सहजपणे यश मिळविता येते. जग अथवा देश बदलाची वाट न पाहता बदलाची सुरुवात स्वत:पासून करण्याची आज खरी गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित विद्यार्थी व युवक, युवतींना दिल्या.नोव्हेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. आपल्या देशात २०१५ पासून हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशासकीय भवन ते प्रियदर्शनी सभागृहापर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. उपरवाही येथील स्किल अन्ड इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट व ब्रह्मपुरी येथील एकलव्य भटक्या मागासवर्गीय संस्थेने पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे युवांमध्ये जनजागृती केली.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे, नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. बल्लारपूर येथील डायमंड कटींग सेन्टरच्या माध्यमातून हिऱ्याला पैलू पाडणाºया कौशल्य विकासाचे प्रात्याक्षिकही युवकांनी अनुभवले. केंद्र संचालक निलेश गुल्हाने यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थी उपस्थित होते.भविष्याचा लष्करप्रमुख जिल्ह्यातूनही होऊ शकतोराज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना युवकांमध्ये कौशल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योजकता निर्माण होण्याकरिता निधीची तरतूद केली आहे. पोंभूर्णा येथे अगरबत्ती व टूथपिक निर्मितीचा उद्योग सुरू करण्यात आला. जिल्ह्यात सैनिकी शाळा सुरू झाली. यातून भविष्यात राष्ट्राचा लष्करप्रमुख या शाळेतून शिकलेला असेल तेव्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून येईल, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी व्यक्त केला.जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता नाहीजिल्ह्यात वनसंपत्ती, खनिज संपत्ती व कृषी संपत्तीची नव्हे तर त्यावर आधारित उद्योगांची कमतरता आहे. हे ओळखूनच चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. बांबूवर आधारित उद्योग करणाºया महिला युवकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होणार आहे. उत्पादनाच्या क्लस्टर पद्धतीचा शोध भारतातच लागल्याने त्याचे महत्त्व तरुणांनी ओळखावे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची अजिबात कमतरता नाही. त्यामुळे युवकांनी निराश न होता योजनांचा लाभ घेऊन जीवनाच्या विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवावे, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले.