शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मनरेगाच्या कामात जिल्ह्यात ‘ब्रह्मपुरी’ अव्वल

By admin | Updated: February 25, 2016 00:50 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील ७८ हजार ३०९ कुटुंबाना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

कोरपन्यात अत्यंत कमी काम : जिल्ह्यात ३३ लाख ९ हजार १७४ मनुष्य दिवस निर्मितचंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील ७८ हजार ३०९ कुटुंबाना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात ५ हजार ९१५ कुटुंबांना १०० दिवस रोजगार पुरविण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुका प्रथम स्थानावर असून या तालुक्यात १८ हजार ३७ कुटुंबांना व ३३ हजार ९८६ व्यक्तींना रोजगार प्राप्त करुन दिला आहे. जिल्ह्यात ३३ लाख ९ हजार १७४ दिवस निर्मित करण्यात आले आहेत. कोरपना तालुक्यात फक्त ७५ कुटुंबांना रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यामुळे कोरपना तालुक्याने मनरेगा अंतर्गत नाममात्र रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे स्पष्ट झाले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात ७ लाख ६१ हजार २०६ मनुष्य दिवस निर्मित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी तालुका रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्ह्यात प्रथम स्थानी आहे. त्या खालोखाल नागभीड तालुक्यात ५ लाख ५० हजार ३३३ मनुष्य दिवस निर्मित झाले असून तो जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. कोरपना तालुका रोजगार उपलब्ध करून देण्यात अत्यंत मागे असून येथे केवळ ४ हजार ३४३ मनुष्य दिवस निर्मिती झाल्याची नोंद आहे. तिसऱ्या स्थानी ३ लाख ५४ हजार ५५६ मनुष्य दिवस निर्माण करणारा सावली तालुका आहे. पाचव्यास्थानी चिमूर तालुका असून चिमूर तालुक्यात ३ लाख १५ हजार ७६७ मनुष्य दिवस निर्मित करण्यात आले आहेत. या तालुक्यात ३१ हजार ४८२ कुटुंबाची नावे नोंदणी असून ९० हजार ७१ व्यक्तीनी नोंद केली आहे. त्यामध्ये ३१ हजार २३८ जॉब कार्ड देण्यात आले आहेत.मराठवाड्यापेक्षा विदर्भात दुष्काळ त्या प्रमाणात नसला तरी सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. कापसाला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असल्याने धान कापणीपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना कामासाठी अनेक ठिकाणी स्थलांतर करावे लागते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मनरेगाची कामे सुरु करण्यात आलेली आहेत. देशात अकुशल कामगारांना रोजगाराचा हक्क मोठ्या प्रमाणात देणारे महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे.जिल्ह्यातील शेतीचा हंगाम संपल्यानंतर मजुराच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगा योजना उपयुक्त ठरली आहे. योजनेच्या माध्यमातून अनेग गावात शेततळे, पांदन रस्ते, सिंचन विहिरी तयार करण्यात यश आले असून सोबतच मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी ही योजना महत्वाची ठरली आहे. मनरेगात केंद्र शासन १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व १०० दिवस प्रति कुटुंब मजुराच्या मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. यामध्ये शौचालय बांधकाम, मुरुम रस्ते, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, तलाव दुरुस्ती, बोडी खोलीकरण इत्यादी कामासह घरकुल, फळबाग लागवड आदी कामे ६०:४० च्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहेत. या योजनेत ब्रह्मपुरी तालुक्याने जिल्ह्यामध्ये जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. (शहर प्रतिनिधी)