शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
3
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
4
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
5
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
6
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
7
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
8
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
9
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
10
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
11
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
12
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
13
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
14
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
15
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
16
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
17
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
18
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
19
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
20
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या कामात जिल्ह्यात ‘ब्रह्मपुरी’ अव्वल

By admin | Updated: February 25, 2016 00:50 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील ७८ हजार ३०९ कुटुंबाना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

कोरपन्यात अत्यंत कमी काम : जिल्ह्यात ३३ लाख ९ हजार १७४ मनुष्य दिवस निर्मितचंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील ७८ हजार ३०९ कुटुंबाना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात ५ हजार ९१५ कुटुंबांना १०० दिवस रोजगार पुरविण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुका प्रथम स्थानावर असून या तालुक्यात १८ हजार ३७ कुटुंबांना व ३३ हजार ९८६ व्यक्तींना रोजगार प्राप्त करुन दिला आहे. जिल्ह्यात ३३ लाख ९ हजार १७४ दिवस निर्मित करण्यात आले आहेत. कोरपना तालुक्यात फक्त ७५ कुटुंबांना रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यामुळे कोरपना तालुक्याने मनरेगा अंतर्गत नाममात्र रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे स्पष्ट झाले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात ७ लाख ६१ हजार २०६ मनुष्य दिवस निर्मित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी तालुका रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्ह्यात प्रथम स्थानी आहे. त्या खालोखाल नागभीड तालुक्यात ५ लाख ५० हजार ३३३ मनुष्य दिवस निर्मित झाले असून तो जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. कोरपना तालुका रोजगार उपलब्ध करून देण्यात अत्यंत मागे असून येथे केवळ ४ हजार ३४३ मनुष्य दिवस निर्मिती झाल्याची नोंद आहे. तिसऱ्या स्थानी ३ लाख ५४ हजार ५५६ मनुष्य दिवस निर्माण करणारा सावली तालुका आहे. पाचव्यास्थानी चिमूर तालुका असून चिमूर तालुक्यात ३ लाख १५ हजार ७६७ मनुष्य दिवस निर्मित करण्यात आले आहेत. या तालुक्यात ३१ हजार ४८२ कुटुंबाची नावे नोंदणी असून ९० हजार ७१ व्यक्तीनी नोंद केली आहे. त्यामध्ये ३१ हजार २३८ जॉब कार्ड देण्यात आले आहेत.मराठवाड्यापेक्षा विदर्भात दुष्काळ त्या प्रमाणात नसला तरी सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. कापसाला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असल्याने धान कापणीपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना कामासाठी अनेक ठिकाणी स्थलांतर करावे लागते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मनरेगाची कामे सुरु करण्यात आलेली आहेत. देशात अकुशल कामगारांना रोजगाराचा हक्क मोठ्या प्रमाणात देणारे महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे.जिल्ह्यातील शेतीचा हंगाम संपल्यानंतर मजुराच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगा योजना उपयुक्त ठरली आहे. योजनेच्या माध्यमातून अनेग गावात शेततळे, पांदन रस्ते, सिंचन विहिरी तयार करण्यात यश आले असून सोबतच मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी ही योजना महत्वाची ठरली आहे. मनरेगात केंद्र शासन १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व १०० दिवस प्रति कुटुंब मजुराच्या मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. यामध्ये शौचालय बांधकाम, मुरुम रस्ते, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, तलाव दुरुस्ती, बोडी खोलीकरण इत्यादी कामासह घरकुल, फळबाग लागवड आदी कामे ६०:४० च्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहेत. या योजनेत ब्रह्मपुरी तालुक्याने जिल्ह्यामध्ये जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. (शहर प्रतिनिधी)