शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी मंत्रा’चा प्रभाव राज्य उत्पादन शुल्क अधिकारीवर पडणार काय?

By admin | Updated: September 8, 2014 01:12 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशातील जनतेला संबोधित करताना ‘भ्रष्टाचार बर्दाश नही करेंगे’

राजुरा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशातील जनतेला संबोधित करताना ‘भ्रष्टाचार बर्दाश नही करेंगे’ असा मंत्र देतानाच भ्रष्टाचारासारख्या गैरप्रकाराला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. परंतु चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांवर त्याचा कोणताच परिणाम व प्रभाव पडला नाही. आजही जिल्ह्यातील परवानाधारक देशी दारू विक्री परवानाधारकांकडून सर्रास बेभाव विक्री सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारू दुकानधारकांकडून देशी दारूची १८० मि.ली. च्या बाटलीची सर्व करासहीत निर्धारित किंमत ३३ रुपये असताना ती ४५ रुपयांत सर्रास विकण्यात येत आहे. चंद्रपूर व राजुरा येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयापासून अवघ्या २०० मिटर अंतरावर दुकान आहे. मात्र तेथेही ४५ रुपयांत देशी दारूच्या बाटलीची विक्री केली जात आहे. दुकानात दर फलक नाही. बसण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे मद्यपीला उभ्यानेच मद्य प्राशन करावे लागत आहे. शासनाने देशी व विदेशी बारला परवानगी दिली असल्याचे म्हटले जाते. विदेशी दारूची विक्री करणाऱ्या बारमध्ये ग्राहकांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु देशी परवानाधारकांनी कोणत्याच सोयी उपलब्ध न करता निर्धारित रकमेपेक्षा प्रती बाटली १२ रुपये जादा घेतले जात आहेत. त्याची पावतीसुद्धा दिली जात नाही. त्यामुळे अधिकची रक्कम शासनाच्या तिजोरीत जात आहे की परवानाधारकांच्या खिशात? याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.देशात भाजपाचे सरकार स्थापन होताच, १५ आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना मोदी मंत्र दिला. त्यात त्यांनी ‘भ्रष्टाचार बर्दाश नही करेंगे’ असे ठामपणे सांगत देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. परंतु त्याचा प्रभाव राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी आणि मागासलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर अद्यापही पडला नाही. त्यामुळे देशी दारू पिणाऱ्या गोरगरीब जनतेची सर्रास लुट परवानाधारक देशी दारू दुकानधारकांकडून केली जात आहे. याला तातडीने पायबंद घालावा, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.काही परवानाधारकांकडून गावोगावी एजन्ट नेमण्यात आले आहेत. त्या एजंटांच्या मार्फत अवैध मार्गाने तिच दारूची बाटली ७५ रुपयांत विकली जात आहे. अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवायचे असते. परंतु पोलिसही या अवैध विक्रीवर आळा घालण्याचे टाळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गावात सहज दारू मिळत असल्यामुळे पिणाऱ्याची संख्या वाढून गावात तंटे भांडणाचे प्रमाणात वाढ झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)