पुण्यातील विद्यार्थ्यांना सुखरुप आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:01 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:01:01+5:30
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व काही खासगी रूग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. ताडोबा व अन्य ठिकाणी विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत.

पुण्यातील विद्यार्थ्यांना सुखरुप आणणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चीन, इटली, इराण, दुब्बई, सौदी अरब तर अन्य राज्यातून आलेले १७ असे एकूण ३३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण आढळला नाही, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील पुण्यात शिकत आहेत. त्यांना चंद्रपुरात आणण्यासाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व काही खासगी रूग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. ताडोबा व अन्य ठिकाणी विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. जिल्ह्यातून विदेशात गेलेल्या व संभाव्यता या काळात परत येणाºया प्रवाशांच्या नोंदीही घेणे सुरू आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना कॉरेन्टाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राचीन व ऐतिहासीक अशी २५ मार्चपासून गुढीपाडव्याच्या पर्वावर सुरू होणारी महाकाली यात्रा स्थगित करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी होणाºया कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला. आरोग्यासाठी नागरिकांनी लग्नकार्य, सामाजिक संघटनांच्या सभा,, यात्रा, महोत्सव, जन्मदिवस, उर्स, धार्मिक कार्यक्रम, सहली, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले.
१७ विद्यार्थी धोक्याबाहेर
कर्नाटकातील गुलबर्गा येथे जिल्ह्यातील १७ मुले शिकत होती. त्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांना चंद्र्रपुरात आणण्यात आले. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक आपापल्या गावाकडे परत येत आहेत. मात्र काही खासगी बसेस चालक प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी कुणाकडूनही वाढीव पैसे घेऊ नये, याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले.
कोलारा येथे संशयित रूग्ण
चिमूर : मासळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या एका संशयित रूग्णाला सतर्कतेचा इशारा म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पेटकर यांनी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा गेट परिसरात असलेल्या एफडीसीएम रिसोर्टमधील एक कर्मचारी सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आला होता.
कोरोनाबाबत डॉक्टरांमध्येही गैरसमज
चंद्रपूर : कोरोना व्हायरसची बाधा कोरोनाचा प्रादूर्भाव असलेल्या देशातून, राज्यातून तसेच शहरातून आलेल्या नागरिकांना होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांनाही बाधा होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रत्येक नागरिकांना देखरेखीखाली ठेवून त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहे. यामध्ये ते निगेटीव्ह आढळल्यास आरोग्य विभागाची यंत्रणा सुटकेचा श्वास घेत आहे. यामध्ये आरोग्य विभागाचा ताण चांगलाच वाढला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही डॉक्टर त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही रुग्णांना खोकला वा ताप असल्याचे लक्षात येताच त्यांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवत आहे. सामान्य रुग्णालयात आल्यानंतर त्या रुग्णांमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसून येत नसल्याचेही पुढे आले आहे. यामध्येही आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा वेळ वाया जात आहे. शिवाय डोक्यालाही ताप होत आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूरातील डॉक्टरांची कार्यशाळा घेऊन त्यांना कोरोनाबाबतची सविस्तर माहिती दिली. याउपरही सुज्ञ वर्गाकडून हा प्रकार घडत असल्याची चर्चा आरोग्य विभागात आहे.
मॉस्कचा तुटवडा
बल्लारपूर : शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. भीतीमुळे नागरिकांनी मास्क लावणे सुरू केले. त्यामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती मेडिकल स्टोअर्सचे संचालक कैलास खंडेलवाल यांनी दिली. नगर परिषद व खासगी प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया मध्यान्ह भोजनाचे काय करायचे, हा प्रश्न शिक्षकांनी विचारला आहे.