शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

संवाद कमी झाल्याने पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:55 IST

ताणतणावही कारणीभूत : नैराश्यातून स्वतःला संपविले;

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये विविध घटनेत अनेकांनी नैराश्यातून स्वतःला संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्येत पुरुष असो की महिला या दोघांचेही प्रमाण पाहता यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्येच्या घटना अधिक असल्याचे मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांतून दिसून येते.

जिल्ह्यातील मागील काही वर्षात झालेल्या आत्महत्येच्या घटना पाहता यात तरुण मुला-मुलींनीसुद्धा जीवन संपविल्याचे समोर आले आहे. अभ्यासाचे कारण, शिवाय मार्क कमी पडल्याने तसेच आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्य रागावल्याने, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कमी पडल्याने मुला-मुलींकडून अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. दुसरीकडे घरातील वाद, मतभेद, भांडण, शिवाय शेती, पैसा अशा संपत्तीच्या कारणातून सुद्धा काही जण आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतात. किरकोळ बाबीमुळे शारीरिक व्याधीसह मानसिक आजारांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.

कारण काय ?आत्महत्येमागे असणाऱ्या विविध कारणांमध्ये नैराश्य, व्यसनाधीनता, मानसिक आजार, ताणतणाव, आर्थिक विवंचना, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, प्रेम, विरह या प्रमुख कारणांचा समावेश होतो. आत्महत्या ही विविध कारणामुळे घडून येणारी घटना आहे. बऱ्याचशा आत्महत्या नैराश्यामधून घडतात. 

मागील काही वर्षांत वाढल्या आत्महत्या

  • मागील काही वर्षांमध्ये अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे दिसून येते. काही जण व्यवसाय बंद पडल्याने किंवा नोकरी गेल्याने निराश होतात. तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने अनेक जण हताश होतात.
  • या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे, या विवंचनेत काही जण टोकाचे पाऊल उचलतात आणि आपले जीवन संपविण्याचा विचार करतात.

जीवन अनमोल आहेआत्महत्येचा विचार मनात येत असेल तर सर्वप्रथम त्याबाबत कुणाजवळ तरी बोलून दाखवावे. जीवन अनमोल आहे. त्याचा आनंद घ्यावा. जीवनातील समस्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. त्यावर कायमचा उपाय करू नये, समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी, गरज असल्यास औषधोपचार घ्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

आत्महत्या करण्यात पुरुषांचे प्रमाण जास्त ?महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण आत्महत्येच्या बाबतीत जास्त असल्याचे विविध आकडेवारीवरून दिसून येते. पोलिस दलाकडे आत्महत्या किंवा अन्य प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली जाते. ताणतणाव असेल तर यातून मार्ग काढता येते.

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्यchandrapur-acचंद्रपूर