शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

संवाद कमी झाल्याने पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:55 IST

ताणतणावही कारणीभूत : नैराश्यातून स्वतःला संपविले;

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये विविध घटनेत अनेकांनी नैराश्यातून स्वतःला संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्येत पुरुष असो की महिला या दोघांचेही प्रमाण पाहता यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्येच्या घटना अधिक असल्याचे मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांतून दिसून येते.

जिल्ह्यातील मागील काही वर्षात झालेल्या आत्महत्येच्या घटना पाहता यात तरुण मुला-मुलींनीसुद्धा जीवन संपविल्याचे समोर आले आहे. अभ्यासाचे कारण, शिवाय मार्क कमी पडल्याने तसेच आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्य रागावल्याने, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कमी पडल्याने मुला-मुलींकडून अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. दुसरीकडे घरातील वाद, मतभेद, भांडण, शिवाय शेती, पैसा अशा संपत्तीच्या कारणातून सुद्धा काही जण आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतात. किरकोळ बाबीमुळे शारीरिक व्याधीसह मानसिक आजारांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.

कारण काय ?आत्महत्येमागे असणाऱ्या विविध कारणांमध्ये नैराश्य, व्यसनाधीनता, मानसिक आजार, ताणतणाव, आर्थिक विवंचना, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, प्रेम, विरह या प्रमुख कारणांचा समावेश होतो. आत्महत्या ही विविध कारणामुळे घडून येणारी घटना आहे. बऱ्याचशा आत्महत्या नैराश्यामधून घडतात. 

मागील काही वर्षांत वाढल्या आत्महत्या

  • मागील काही वर्षांमध्ये अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे दिसून येते. काही जण व्यवसाय बंद पडल्याने किंवा नोकरी गेल्याने निराश होतात. तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने अनेक जण हताश होतात.
  • या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे, या विवंचनेत काही जण टोकाचे पाऊल उचलतात आणि आपले जीवन संपविण्याचा विचार करतात.

जीवन अनमोल आहेआत्महत्येचा विचार मनात येत असेल तर सर्वप्रथम त्याबाबत कुणाजवळ तरी बोलून दाखवावे. जीवन अनमोल आहे. त्याचा आनंद घ्यावा. जीवनातील समस्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. त्यावर कायमचा उपाय करू नये, समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी, गरज असल्यास औषधोपचार घ्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

आत्महत्या करण्यात पुरुषांचे प्रमाण जास्त ?महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण आत्महत्येच्या बाबतीत जास्त असल्याचे विविध आकडेवारीवरून दिसून येते. पोलिस दलाकडे आत्महत्या किंवा अन्य प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली जाते. ताणतणाव असेल तर यातून मार्ग काढता येते.

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्यchandrapur-acचंद्रपूर