शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

तणाव, भीतीतून टोकाचा विचार आल्यास काय कराल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:56 IST

Chandrapur : ऐका मानसिक रोगतज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जीव नको झालाय, जीव द्यावा असे वाटणे, सतत निराश वाटणे, मनात आत्महत्येसारखे विचार येत असल्यास खचून न जाता आपल्या मनाची स्थिती आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा, त्यावर उपाय शोधा; तरीही असा प्रकार सुरू असेल तर मानसिक रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे आवाहन मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांनी केले आहे.

अनेकदा आपल्या आयुष्यात भयंकर अनपेक्षित प्रसंग येतात. ताण वाढतो. कधी आपला अपमान होतो, कधी कुणी कमी लेखतं, कधी आर्थिक तंगी, कधी प्रेमभंग, कधी कुणी छळतं, सातत्याने प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे समोर वाटच दिसत नाही. अशावेळी निराश होणं, स्वतःवरचा ताबा सुटणं साहजिकच असतं. पण, तीच वेळ असते स्वतःला सावरून पुन्हा उभं राहण्याची. अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला याबाबत माहिती देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, सकारात्मक विचार केल्यास चांगला फायदा मिळू शकतो, असा सल्ला मानसिक रोग तज्ज्ञ बांबोळे यांनी दिला आहे.

आत्महत्येच्या घटना वाढतीवरमागील काही महिन्यांत जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांत वाढ झाली आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नैराश्य आल्यास जवळच्या व्यक्तींशी संवाद साधावा.

आत्महत्येची कारणे काय?● तणाव : विविध कारणातून वाढलेला तणाव आत्महत्येचे मोठे कारण दिसून येत आहे. मात्र, याला आत्महत्या हा पर्याय नाही. समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर मार्ग निघत असतो.● बेरोजगारी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. व्यवसायासाठी भांडवल मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण होत असून, ते टोकाचा निर्णय घेत आहेत.● नापिकी : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

काय करायला हवे?● सकारात्मक विचार : आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करायला हवा. सकारात्मक विचारामुळे ऊर्जा निर्माण होते आणि मन प्रसन्न राहते.● संवाद साधा : आत्महत्येसारखे विचार मनात येत असल्यास आपल्या जवळील व्यक्तींशी संवाद साधा, मन हलके करा.● छंद जोपासा : आपल्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर आपल्या आवडीचे छंद जोपासावेत, चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे.● मित्रांसोबत वेळ घालवा : मित्रांसोबत वेळ घालविल्याणे एकाकीपणा कमी होतो. त्यामुळे एकटे न राहता मित्रांसोबत वेळ घालवा.● पौष्टिक आहार घ्या : पौष्टिक आहार घ्यावा. नियमित व्यायाम किंवा योगा केल्यास मन प्रसन्न राहते.

आपल्या मनानुसार सर्व गोष्टी घडतील असे नाही. बरेचदा तडजोड करावी लागते. परंतु, आलेली कठीण परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते. ती तात्पुरती असते. नेहमी तशीच स्थिती राहील असे नाही. त्यामुळे धीर सोडू नये, संयम बाळगावा, कठीण परिस्थितीत चांगल्यात चांगलं काय करता येईल त्याच्याकडे फोकस करा. उदास, नाराज वाटत असेल तर जवळील व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला. मानसिक रोगतज्ज्ञाचा सल्ला घ्या. - डॉ. विवेक बांबोळे, मानसिक रोगतज्ज्ञ, चंद्रपूर

 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यchandrapur-acचंद्रपूर