शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

जिवावर बेतणारे असे धाडस काय कामाचे?

By admin | Updated: May 31, 2017 01:47 IST

काही अविचारी लोक नको तेथे अवास्तव धाडस करून विनाकारण आपला जीव गमावतात. धावत्या रेल्वेगाडीत,

वसंत खेडेकर। लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : काही अविचारी लोक नको तेथे अवास्तव धाडस करून विनाकारण आपला जीव गमावतात. धावत्या रेल्वेगाडीत, गाडीच्या उघड्या दारावर अगदी काठावर उभे राहून हवेशी बात करणे हे त्यातीलच एक नेहमीचे आपल्या अवती भवती दिसणारे धाडस. या अशा धाडसापायी अनेकांचे जीव गेले व जात आहेत. दोन दिवसापूर्वी, माजरी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर झुडपात एका अनोळखी युवकाचे फुगून असलेले प्रेत आढळून आले. हे रेल्वे स्थानक बल्लारशाह रेल्वे पोलिसांच्या कक्षेत येत असल्याने पोलिसांनी त्या प्रेताचा पंचनामा केला. एकंदरीत तेथील स्थिती बघता, हा युवक धावत्या गाडीतून पडून मृत पावला असावा. या निष्कर्षावर पोलीस पोहचले. तो कोण, कुठला हे कळले नाही. रेल्वेने पडून मरण पावल्याच्या घटना होत असतात. याला कारणीभूत बळी पडणारे प्रवाशी व त्यांचा निष्काळजीपणा आणि विनाकारण अंगी आणलेले धाडस हेच असते. डब्यात बसायला भरपूर मोकळी जागा असूनही अतिउत्साही प्रवाशी जाणून दारावर बसतात नुसते बसतच नाही, तर हातवारे-पायवारे करतात. पूर्ण शरीर डब्याबाहेर झोकून देतात. मग, त्यांना रस्त्यात येणाऱ्या सिग्नल खांबांची भिती किंवा अन्य कुणाची भिती वाटत नाही. त्यात थोडक्यात निभावले तर ठीक नाही तर त्याचे वाईट परिणाम होतात हे आपण बघतोच. काही उत्साही बाप आपल्या लहान लेकरांनाही दारावर घेऊन बसतात. याला काय म्हणावे? त्यांना सांगणार कोण? टीसीचा डब्यात फेरफटका असला की, ते त्यांची कानउघडणी करतात. पण, ते तेवढ्यापुरतेच असते. जी गोष्ट रेल्वेची, तीच पण थोड्या फार फरकाने सडक मार्गावरुन धावणाऱ्या आटो व काळ्यापिवळ्या प्रवाशी गाड्यांची! त्या गाड्यांमध्ये बसण्याची असलेल्या क्षमतेच्या तीन चार पटीने प्रवाशी कोंबतात. एवढे की, चालकाच्या दोन्ही बाजूला दोन दोन जणांना बसविले जाते. या प्रकाराने वाहनाच्या चालकाला पुरेसे नियंत्रण करण्याला मोकळिक मिळावी, अशी जागाच मिळत नसल्याने आणिबाणी प्रसंगी वाहन अनियंत्रीत होवून अपघात घडतो. प्रवाशांचे व चालक यांचे जीव जातात. वाहनात किती प्रवाशी बसवावे याचे वाहतूक नियम आहेत, पण ते पाळल्या जात नाही. पोलिसांना हे सर्व दिसत असूनही अर्थकारणामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. तशीच गोष्ट मार्गावर धावणाऱ्या दोन चाकी वाहनांची. स्कुटी वा बाईकवर दोनजण बसण्याचा नियम आहे. मात्र या नियमाला बंगल देत दुचाकी वाहनांवर तीन ते चारजण बसविण्यात येत असतात. साधारणत: नवरा, बायको, दोन वा तीन मुलं व सोबतीला गाडीच्या दोन्ही बाजूंना भल्या मोठ्या वजनी बॅगा! कोंबून बसलेल्या लहान लहान मुलांना सहजपणे श्वासही घेता येऊ नये सा कोंडमारा. अशा अवस्थेत भर उन्हात काही जण ३०-४० किलोमीटरचा प्रवास करतात. सडक अरुंद, खडतर रोड असले की अपघाताची शक्यता अधिक! पण, अति उत्साह, बेफिकीरी, पैसे आणि वेळ वाचविण्याची वृत्ती- त्यातून अघटीत घडले की हानी आपलीच होते, ही बाब असे लोक ध्यानीच घेत नाही. आणखी एक प्रकार नदीच पोहण्याचा. आपण पोहण्यात तरबेज आहोत असे प्रत्येक पोहणाऱ्यांना वाटत असते. त्यामुळे, पाण्यावर आपली हुकूमत आहे अशा आविर्भावात पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरतात दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीच्या बल्लारपूर येथील गणेश विसर्जन घाटावर आंघोळीला पाण्यात उतरलेल्या नागपूरच्या १७ व १९ वर्षीय भावंडांचा बुडून जीव गेला. ते येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नात आले होते. त्यांच्या या निधनाने लग्नघरी शोककळा पसरल्या. अविवेक, अति उत्साह यातून अशा अप्रिय घटना घडतात. ‘हऽऽ, क्या होता है’ अशी दर्पोक्ती व अति आत्मविश्वासातून असे होते. पण, काळ सारखा राहत नाही आदमी को चाहिए वक्त से डरकर रहे, कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज’ असे शाहीर लुधियानवी यांनी लिहून ठेवले, ते उगीच नव्हे! त्यामुळे कुठेही असो, सावधानी बाळगणे हेच उत्तम.