शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

हिरावला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:56 PM

बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला.

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण : ९० टक्के पीक बाधित

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला. एक लाख ८२ हजार हेक्टरवरील कापसापैकी तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टरवरील पीक बोंडअळीने खावून टाकली तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टरवरील धानपिकापैकी एक लाख पाच हजार ५० हेक्टरवरील पीक तुडतुड्याने उद्ध्वस्त केले. अगदी तोंडात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी ऋतुचक्राने आपली नियमितता आणि सातत्य कायम राखले नाही. कोणत्याही ऋतुने आपले गुणधर्म दाखविले नाही. वातावरणाच्या या बदलाचा कृषी क्षेत्राला यंदा चांगलाच फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर धानपीक लावण्यात आले. दोन्ही पिके प्रारंभी चांगले होते. पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकºयांनी पिकांची चांगली काळजी घेतली होती. त्यामुळे पिकांची वाढ भराभर झाली. मात्र सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात अचानक कापसावर बोंडअळीने आणि धानावर तपकिरी तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. प्रकोप एवढा मोठा होता की जवळजवळ ९० टक्के लागवड क्षेत्र या रोगामुळे बाधित झाले. तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाला. दुसरीकडे तुडतुड्याने एक लाख पाच हजार ५० हेक्टर क्षेत्रावरील धानपिकाची तणस करून टाकली.दीड लाखांवर धान उत्पादकांना फटकाजिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी हा धान पट्टा मानला जातो. या पट्टयातील संपूर्ण शेती तुडतुड्याने बाधित करून टाकली आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार तब्बल एक लाख ६५ हजार ५९७ शेतकºयांना तुडतुड्यामुळे जबर फटका बसला आहे.तीन हजार १३७ कापूस उत्पादकांचे नुकसानजिल्ह्यातील राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, जिवती या तालुक्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या तालुक्यांमधील तब्बल तीन हजार १३७ शेतकºयांच्या पिकांवर बोंडअळीचा प्रकोप सर्व्हेक्षणात दिसून आला.आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आघातबोंडअळी आणि तुडतुडा हे पिकांवरील रोग जिल्ह्यासाठी नवीन नाही. या दोन्ही रोगांचे यापूर्वीही पिकांवर आक्रमण झाले आहे. मात्र यावर्षी तब्बल ९० टक्के कृषी क्षेत्र या रोगांनी व्यापले आहे. मागील दहा वर्षांत या रोगांनी एवढे नुकसान कधीच केले नव्हते. आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा प्रकोप असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.वातावरणातील बदल कारणीभूतबोंडअळी आणि तुडतुडा हे रोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास वातावरणातील बदल कारणीभूत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यावर्षी पावसाळ्यात पाऊस नव्हता. कधी उन्हाळ्यासारखे वातावरण होते. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दमट वातावरण तयार झाले होते. हे वातावरण या अळ्यांना पोषक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी बोंडअळी आणि तुडतुड्याने चांगलाच प्रकोप केला आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांचे सर्व्हेक्षण केले आहे. यासबंधीचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.- ए.आर. हसनाबादे,जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी