शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

हिरावला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:56 IST

बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला.

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण : ९० टक्के पीक बाधित

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला. एक लाख ८२ हजार हेक्टरवरील कापसापैकी तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टरवरील पीक बोंडअळीने खावून टाकली तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टरवरील धानपिकापैकी एक लाख पाच हजार ५० हेक्टरवरील पीक तुडतुड्याने उद्ध्वस्त केले. अगदी तोंडात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी ऋतुचक्राने आपली नियमितता आणि सातत्य कायम राखले नाही. कोणत्याही ऋतुने आपले गुणधर्म दाखविले नाही. वातावरणाच्या या बदलाचा कृषी क्षेत्राला यंदा चांगलाच फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर धानपीक लावण्यात आले. दोन्ही पिके प्रारंभी चांगले होते. पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकºयांनी पिकांची चांगली काळजी घेतली होती. त्यामुळे पिकांची वाढ भराभर झाली. मात्र सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात अचानक कापसावर बोंडअळीने आणि धानावर तपकिरी तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. प्रकोप एवढा मोठा होता की जवळजवळ ९० टक्के लागवड क्षेत्र या रोगामुळे बाधित झाले. तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाला. दुसरीकडे तुडतुड्याने एक लाख पाच हजार ५० हेक्टर क्षेत्रावरील धानपिकाची तणस करून टाकली.दीड लाखांवर धान उत्पादकांना फटकाजिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी हा धान पट्टा मानला जातो. या पट्टयातील संपूर्ण शेती तुडतुड्याने बाधित करून टाकली आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार तब्बल एक लाख ६५ हजार ५९७ शेतकºयांना तुडतुड्यामुळे जबर फटका बसला आहे.तीन हजार १३७ कापूस उत्पादकांचे नुकसानजिल्ह्यातील राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, जिवती या तालुक्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या तालुक्यांमधील तब्बल तीन हजार १३७ शेतकºयांच्या पिकांवर बोंडअळीचा प्रकोप सर्व्हेक्षणात दिसून आला.आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आघातबोंडअळी आणि तुडतुडा हे पिकांवरील रोग जिल्ह्यासाठी नवीन नाही. या दोन्ही रोगांचे यापूर्वीही पिकांवर आक्रमण झाले आहे. मात्र यावर्षी तब्बल ९० टक्के कृषी क्षेत्र या रोगांनी व्यापले आहे. मागील दहा वर्षांत या रोगांनी एवढे नुकसान कधीच केले नव्हते. आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा प्रकोप असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.वातावरणातील बदल कारणीभूतबोंडअळी आणि तुडतुडा हे रोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास वातावरणातील बदल कारणीभूत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यावर्षी पावसाळ्यात पाऊस नव्हता. कधी उन्हाळ्यासारखे वातावरण होते. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दमट वातावरण तयार झाले होते. हे वातावरण या अळ्यांना पोषक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी बोंडअळी आणि तुडतुड्याने चांगलाच प्रकोप केला आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांचे सर्व्हेक्षण केले आहे. यासबंधीचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.- ए.आर. हसनाबादे,जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी