शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

हिरावला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:56 IST

बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला.

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण : ९० टक्के पीक बाधित

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला. एक लाख ८२ हजार हेक्टरवरील कापसापैकी तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टरवरील पीक बोंडअळीने खावून टाकली तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टरवरील धानपिकापैकी एक लाख पाच हजार ५० हेक्टरवरील पीक तुडतुड्याने उद्ध्वस्त केले. अगदी तोंडात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी ऋतुचक्राने आपली नियमितता आणि सातत्य कायम राखले नाही. कोणत्याही ऋतुने आपले गुणधर्म दाखविले नाही. वातावरणाच्या या बदलाचा कृषी क्षेत्राला यंदा चांगलाच फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर धानपीक लावण्यात आले. दोन्ही पिके प्रारंभी चांगले होते. पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकºयांनी पिकांची चांगली काळजी घेतली होती. त्यामुळे पिकांची वाढ भराभर झाली. मात्र सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात अचानक कापसावर बोंडअळीने आणि धानावर तपकिरी तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. प्रकोप एवढा मोठा होता की जवळजवळ ९० टक्के लागवड क्षेत्र या रोगामुळे बाधित झाले. तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाला. दुसरीकडे तुडतुड्याने एक लाख पाच हजार ५० हेक्टर क्षेत्रावरील धानपिकाची तणस करून टाकली.दीड लाखांवर धान उत्पादकांना फटकाजिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी हा धान पट्टा मानला जातो. या पट्टयातील संपूर्ण शेती तुडतुड्याने बाधित करून टाकली आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार तब्बल एक लाख ६५ हजार ५९७ शेतकºयांना तुडतुड्यामुळे जबर फटका बसला आहे.तीन हजार १३७ कापूस उत्पादकांचे नुकसानजिल्ह्यातील राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, जिवती या तालुक्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या तालुक्यांमधील तब्बल तीन हजार १३७ शेतकºयांच्या पिकांवर बोंडअळीचा प्रकोप सर्व्हेक्षणात दिसून आला.आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आघातबोंडअळी आणि तुडतुडा हे पिकांवरील रोग जिल्ह्यासाठी नवीन नाही. या दोन्ही रोगांचे यापूर्वीही पिकांवर आक्रमण झाले आहे. मात्र यावर्षी तब्बल ९० टक्के कृषी क्षेत्र या रोगांनी व्यापले आहे. मागील दहा वर्षांत या रोगांनी एवढे नुकसान कधीच केले नव्हते. आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा प्रकोप असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.वातावरणातील बदल कारणीभूतबोंडअळी आणि तुडतुडा हे रोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास वातावरणातील बदल कारणीभूत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यावर्षी पावसाळ्यात पाऊस नव्हता. कधी उन्हाळ्यासारखे वातावरण होते. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दमट वातावरण तयार झाले होते. हे वातावरण या अळ्यांना पोषक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी बोंडअळी आणि तुडतुड्याने चांगलाच प्रकोप केला आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांचे सर्व्हेक्षण केले आहे. यासबंधीचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.- ए.आर. हसनाबादे,जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी