शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

आम्ही शासक नसून जनतेचे सेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:04 PM

आम्ही शासन नसून जनतेचे सेवक आहोत. राज्यातील जनता माझे दैवत आहे. या दैवतांचे दर्शन घेण्यासाठीच आपण ब्रह्मपुरीला आलो असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : ब्रह्मपुरीत महाजनादेश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आम्ही शासन नसून जनतेचे सेवक आहोत. राज्यातील जनता माझे दैवत आहे. या दैवतांचे दर्शन घेण्यासाठीच आपण ब्रह्मपुरीला आलो असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, ना. परिणय फुके, आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, आ. सुरजितसिंग ठाकूर, आ. क्रीष्णा गजबे, प्रणाली मैद, दीपाली मेश्राम, धनराज मुंगले, वसंत वारजुकर, संजय गजपुरे, क्रीष्णा सहारे, तंगडपल्लीवार, नानाजी तुपट आदींची यावेळी उपस्थिती होती.शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे. मागील पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सरकारने मदत केली आहे. धान उत्पादकांना दिलासा दिला आहे. जलयुक्त शिवार, तलाव खोलीकरण, गोसीखुर्द प्रकल्प आदींवर समाधानकारक कामे झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रस्ते निर्मिती, विद्यार्थी, ओबीसी आरक्षण यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी खासदार अशोक नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी मनोगत व्यक्त केले आहे. प्रास्ताविक आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.सभास्थळ ते रेल्वे गेटपर्यंत रथयात्रासभास्थळ ते रेल्वेगेट असा दोन किमी प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी खुल्या रथावर उभे राहून अभिवादन केले.काँग्रेस कार्यालयासमोर बंदोबस्तमहाजनाजेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री ब्रह्मपुरी दाखल झाले होते. दरम्यान, आज काँग्रेस कार्यालयासमोर महाराष्ट्र युवतीकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी मैत्री दिन कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच रक्षाबंधन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठकही बोलावली असल्यामुळे मोठ्या संख्येने येथे कार्यकर्ते जमले होते. दरम्यान, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.