शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

बल्लारपूर तालुक्यातील सौर ऊर्जेवरील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:14 IST

गावागावात पाणीपुरवठा योजना भरमसाठ वीज बिलामुळे ठप्प होत आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक टंचाईमुळे पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीज बिलामुळे नळयोजना बंद असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून बल्लारपूर तालुक्यात १२ सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना अंमलात आली.

ठळक मुद्देपंचायत समितीचे दुर्लक्ष : गावात पाण्याची भीषण टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : गावागावात पाणीपुरवठा योजना भरमसाठ वीज बिलामुळे ठप्प होत आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक टंचाईमुळे पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीज बिलामुळे नळयोजना बंद असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून बल्लारपूर तालुक्यात १२ सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना अंमलात आली. मात्र या योजनाही दुरुस्तीअभावी बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रशासनाच्या वतीने बल्लारपूर तालुक्यात कोठारी, मानोरा, गिलबिली, कळमना, किन्ही, विसापूर, इटोली, पळसगाव व कोर्टी या ग्रामपंचायतीत १२ सौर उर्जा पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले होते. तसेच ग्रामपंचायतीवर बसणारा वीज बिलाचा भुर्दंड कमी झाला होता. हातपंपावर आधारित या पाणी पुरवठा योजनेमुळे नागरिकांची पाण्याची तहान भागविण्यासाठी मदत झाली होती. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने या योजनेची योग्य देखभाल व दुरुस्ती केली नाही. यामुळे कोठारी, विसापूर, हडस्ती, चारवट, कळमना, किन्ही येथील सौर उर्जेवरील पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. या योजना बंद पडल्याने गावातील महिलांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.सौर उर्जा योजना बंद असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीला करूनही त्या दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्यातील बंद पडलेल्या सौरउर्जा पाणी पुरवठा योजनांची त्वरित दुरुस्ती करून पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.