शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

अकरा वर्षांपासून पाणी पुरवठा योजना अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 00:49 IST

सिंदेवाही उपविभागीय ग्रामीण पाणी पुरवठा विभागातंर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील कसरगाव ग्रामपंचायतीला ....

पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष : शाखा अभियंता गैरहजरगेवरा : सिंदेवाही उपविभागीय ग्रामीण पाणी पुरवठा विभागातंर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील कसरगाव ग्रामपंचायतीला लघुनळ पाणीपुरवठा योजना सन २००५-०६ यावर्षी मंजुर करण्यात आला. मात्र तब्बल तेरा वर्षापासून ही योजना अर्धवट अवस्थेत असल्याने या गावातील नागरिकांना केवळ जुन्या विहिरी व हातपंपाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा निधी व्यर्थ गेल्याचे दिसून येत आहे.सदर योजनेच्या क्रियान्वयाकरिता ११ वर्षापूर्वी मूल येथील एका कंत्राटदाराला करारनामा करुन देण्यात आला होता. गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर पाणी उपसा करणारी विहिरीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. तर या विहिरीपासून गावातील नळाना पाणी पुरवठा करणारी पाण्याच्या टाकीचे बांधकाम फक्त चार खांब उभे करुन अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे त्या टाकीवरील लोखंडी सळाख पूर्णपणे गंजलेल्या आहेत. सदर काम करणाऱ्या कंत्राटदाराचे मृत्यू झाल्याने सदर काम तब्बल अकरा वर्षापासून प्रलंबीत आहे. मात्र याकडे ग्रामिण पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता व स्थानिक सनियंत्रणाकरिता ग्रामस्थ समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीची अध्यक्षपदी स्थानिक सरपंच व सचिवपदी ग्रामस्थांचा प्रतिनिधी म्हणून एक व्यक्तीची निवड करण्यात आली होती. मात्र या समितीनेसुद्धा या योजनेचा पाठपुरावा केला नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या योजनेचा बांधकामाकरिता झालेला आर्थिक हिशोब व ताळमेळ जुळत नसून साहित्य खरेदी, वापर, व शिल्लक साहित्याचा हिशोब अजूनपर्यंत मागील समितीने नवीन समितीला दिला नसल्याचा आरोपही नवीन समितीने केला आहे. केवळ कागदोपत्री हिशोब मिळाला असल्याने पुढील कामाचा नियोजनाविषयी निर्णय घेणे कठीण झाले आहे. या कामाबाबत नवीन समिती अध्यक्षांकडून सिंदेवाही ग्रामीण पुरवठा कार्यालयातील सावली तालुक्याची जबाबदारी असलेला शाखा अभियंत्याकडे संपर्क सुरु आहे. मात्र कार्यालयाला नेहमीच अनुपस्थिती असल्याने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, टोलवा टोलवीच करण्यात येत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. कामाची संपूर्ण जबाबदारी संबंधीत विभागावर असल्याने कर्तव्यात नेहमी गैरहजर राहणाऱ्या शाखा अभियंत्याच्या उपस्थितीशिवाय कसरगाव वासियांच्या नळ योजनेचे अर्धवट स्वप्न साकार होवू शकत नाही हे विशेष.सदर काम अर्धवट असल्याने शासनाचा लाखों रुपयांचा निधी व्यर्थ गेल्याची चर्चा परिसरात करण्यात येत आहे. संबंधित सर्वच घटक जबाबदार असून शसनाचा तिजोरीतून जनतेच्या विकासाच्या योजनांचा नावावर खर्ची घालताना त्यावर तांत्रीक शाखा अभियंत्यांची फार मोठी जबाबदारी असते परंतु शासन निधी या चुराडा होण्यापर्यंत परिस्थिती निर्माण होणे प्रशासनाकरिता आत्मचिंतन करणारी बाब आहे. (वार्ताहर)