शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सुप्रिम कोर्ट संतप्त, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
4
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
5
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
6
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
7
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
8
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
9
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
10
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
11
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
12
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
13
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
14
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
15
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
16
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
17
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
18
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
19
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
20
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
Daily Top 2Weekly Top 5

रबीच्या आशेवर अवकाळी पाणी

By admin | Updated: March 1, 2016 00:34 IST

यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागला.

घुग्घुसमध्ये गारपीट : ब्रह्मपुरी, जिवती, सिंदेवाही तालुक्याला वादळी पावसाचा तडाखाचंद्रपूर : यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागला. कमी पावसामुळे पिके नष्ट होऊन उत्पन्नात कमालीची घट आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रबी हंगामावर आशा होती. मात्र पीक हाती येण्याच्या तोंडावर अवकाळी पावसाने रबी हंगामातही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी फेरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. घुग्घुस येथे रविवारी रात्री गारपीट झाली. तर सोमवारी ब्रह्मपुरी, जिवती, सिंदेवाही, चिमूर, मूल, सावली, गोंडपिंपरी आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी, तूर उडीद, मुंग या रबी पिकांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. शनिवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. चंद्रपुरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला होता. चिमूर, बल्लारपूर, सावली, नागभीड या तालुक्यातही शनिवारी रिमझीम पाऊस झाला. मात्र त्यानंतरही ढगाळ वातावरण दूर न झाल्याने पाऊस येण्याची शक्यता कायम होती. सोमवारी सिंदेवाही, सावली तालुक्यातील गेवरा, जिवती तालुक्यातील पाटण, गडचांदूर, घुग्घुस व ब्रह्मपुरी येथे मुसळधार पाऊस झाला. तर सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरीत पून्हा पाऊस झाला. सिंदेवाही येथेही सुमारे एक तास झालेल्या वादळी पावसाने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले. वादळामुळे अनेक विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. आठवडी बाजारातील दुकानदारांनाही वादळामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. सध्या अनेक शेतकऱ्यांचे रबी पीक हाती येण्याच्या स्थितीत असून लाखोरी, तूर, हरभरा, गहू आदी रबी पिके कापणी करून शेतात ढीग करून आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. चार दिवसांपासूनच चंद्रपूरसह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची भिती शेतकऱ्यांना होती. शनिवारी चंद्रपुरात तर रविवारी व सोमवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (लोकमत चमू)बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीचा कळस कोसळलाचिमुरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या वादळाचा घोडा यात्रेत सहभागी यात्रेकरूंना बसला. अनेक दुकानाचे पत्रे उडाले तर काही दुकानांमध्ये पाणी शिरले. घोडायात्रेसाठी बालाजी मंदिराची प्रतिकृती असलेले थर्मोकोलचे मंदिर उभारण्यात आले होते. मात्र वादळामुळे या मंदिर प्रतिकृतीचा कळस जमीनवर कोसळला. ब्रह्मपुरीत विजांचा गडगडाटसोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी शहरात तसेच परिसरातील गावांमध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात ५ हजार ८७८ हेक्टरवर यावर्षी रबी पिकांची पेरणी झाली आहे. यात गहू, हरभरा, उडीद, मुंग, लाखोरी आदी पिकांचा समावेश आहे. मात्र अवकाळी पावसाने या पिकांना मोठा फटका बसला असून गव्हाची शाईनिंग व उतारीवर फरक पडण्याची शक्यता आहे. झाडे कोसळल्याने मार्ग बंदसोमवारी सायंकाळी चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, भिसी, मूल, सावली या तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. चिमूर तालुक्यातील चिमूर- सिंदेवाही, नेरी- मोटेगाव- सिंदेवाही, नेरी- नवरगाव या मार्गावर वादळामुळे झाडे कोसळल्याने हे मार्ग बंद झाले. मूल तालुक्याला वादळाचा तडाखा बसला तर गोंडपिंपरी, सावली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.घुग्घुसात गारपीट, वीज पुरवठा खंडीत रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घुग्घुस येथे गारपीटीसह पाऊस झाला. यावेळी वादळाचा प्रवाहही जास्त होता. त्यामुळे घुग्घुस शहराचा वीज पुरवठा पुर्णत: खंडीत झाला होता. जिवती, गडचांदूर येथेही वादळी पाऊस झाल्याने वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता.