शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

२३१ विहिरींना वीज जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्यात कोणताही फायदा नागभीड तालुक्यास नाही. या तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत.

ठळक मुद्देशासनदरबारी अडली योजना : ऐन हंगामात शेतकऱ्यांची सिंचनासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात २३१ कृषीविहिरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या जोडण्यांचा प्रश्न शासन स्तरावरून निविदा निघाल्यानंतरच मार्गी लागू शकतो, अशी माहिती आहे. आता निविदा केव्हा निघतात, याकडे लक्ष लागले आहे.नागभीड तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळांपैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. असे असले तरी सिंचनाची कोणतीही सोय ता तालुक्यात नाही. घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्यात कोणताही फायदा नागभीड तालुक्यास नाही. या तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. यावर उपाय म्हणून गेल्या काही वषार्पासून या तालुक्यातील शेतकरी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विहिरींच्या विविध योजनांचा लाभ घेत असून या विहिरींच्या माध्यमातून शेतीला ओलीत करीत आहेत. २००० ते मार्च २०१८ पर्यंत या तालुक्यातील जवळपास दोन हजार २०३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.माहितीनुसार जवाहर विहीर योजना, जीवनधारा विहीर योजना, महाराष्ट्र ग्रामीण विहीर योजना, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना या योजनांमधील विहिरीच्या २३१ लाभार्थ्यांनी विहिरीचे काम पूर्ण करून विद्युत मंडळाकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले असल्याची माहिती आहे. या २३१ लाभार्थ्यांनी विद्युत मंडळाकडे अधिकृत वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणाला आणि नापिकीला कंटाळून या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये. या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी मिळाली तर ते आपल्या उत्पादनात निश्चितच भर घालू शकतात.५९ शेतकऱ्यांकडेच सौर जोडणीविद्युत किंवा सौर ऊर्जा जोडणी असा शेतकºयांना पर्याय असला तरी अधिकांश शेतकऱ्यांचा विद्युत जोडणीकडेच कल आहे. म्हणूनच आतापर्यंत केवळ ५९ शेतकऱ्यांनीच सौरऊर्जा जोडणीला पसंती दिली आहे. विद्युत जोडणीची डिमांड सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी १० हजार ११४ रुपए तर सौरऊर्जा संचाची डिमांड १६ हजार ५६० रुपये आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विद्युत जोडणी डिमांड एक हजार ६१८ तर सौर ऊर्जा डिमांड दोन हजार २८० रुपये आहे.

टॅग्स :electricityवीजIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प