शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

बालउद्यानाला निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:17 IST

राजुरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीमधील महसूल विभागाच्या सर्र्वेे क्रमांक १७३ मधील आराजी ०.५५ हेक्टर आर. जमिनीवर बालोद्यानाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देवृक्षसंवर्धनासाठी उपसरपंचाची धडपड : जनप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कविहिरगाव : राजुरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीमधील महसूल विभागाच्या सर्र्वेे क्रमांक १७३ मधील आराजी ०.५५ हेक्टर आर. जमिनीवर बालोद्यानाला सुरुवात करण्यात आली. मात्र या उद्यानाला शासनाकडून कोणताही निधी येत नसल्यामुळे बामणवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्वानंद वाघमारे हे स्वखर्चातून वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन करीत आहेत. सद्यास्थितीत सदर उद्यान हिरवेगार झाले असून लहान बालकांपासून अबाल वृद्ध मोठ्या प्रमाणात या उद्यानामध्ये येत आहेत. त्यामुळे या उद्यांनाला अधिक आकर्षीत करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त या उद्यानामध्ये निम, आंबा, पिंपळ, करंजी, जांभूळ, करवंत, पाम, गुलमोहर यासह विविध फुले व वनौषधींची लागवड करयात आली आहे. त्यामुळे उद्यानाचा परिसर हिरवागार दिसून येत आहे. मुंबई येथील एका बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या आसपासची गावे दत्तक घेऊन तेथील लोकसंख्येएवढी झाडे लावावीत व संपूर्ण गाव हिरवेगार करावे, असे आवाहन केले होते. वृक्ष लागवडीच्या महायोजनेला प्रभावित होऊन सर्वानंद वाघमारे यांनी इतर नागरिकांच्या सहकार्याने, स्वखर्चातून व लोकसहभागातून वृक्षलागवड व बालोद्यानाची निर्मिती केली.उद्यानातील झाडांना उन्हापासून वाचविण्याकरिता ते स्वत: टिकेदार यांच्या घरच्या खासगी बोअरवेलमधून पाण्याचा वापर करून झाडांना देत आहेत. वाघमारे यांनी स्वत: बालोद्यानाचा एक सुंदर प्रकल्प तयार केला. त्याच्या प्रती आमदार ते पंतप्रधान यांच्यामार्फत पाठविल्या. पालकमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावरून मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांनी या बालोद्यानाच्या जागेची तपासणी करून प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी तत्काळ पाठविण्याचे निर्देश दिले. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बालोद्यानाची जागा महसूल विभागाची असल्यामुळे आम्ही निधी उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे सांगितले.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हिरवेगार करण्याच्या वनमंत्र्यांच्या स्वप्नात सहभागी झालेले बामणवाडा येथील नागरिक निधीअभावी हिरमुसले आहेत. अजूनही त्यांना शासनाच्या सहकार्याची प्रतीक्षा आहे. एकीकडे शासन शेकडो वृक्षलागवडीही मोहीम राबवीत आहेत, तर दुसरीकडे स्वत: पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून वृक्षलागवडीकरिता सरसावलेल्या नागरिकांवर निधीअभावी हतबल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या उद्यानासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.