शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बालउद्यानाला निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:17 IST

राजुरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीमधील महसूल विभागाच्या सर्र्वेे क्रमांक १७३ मधील आराजी ०.५५ हेक्टर आर. जमिनीवर बालोद्यानाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देवृक्षसंवर्धनासाठी उपसरपंचाची धडपड : जनप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कविहिरगाव : राजुरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीमधील महसूल विभागाच्या सर्र्वेे क्रमांक १७३ मधील आराजी ०.५५ हेक्टर आर. जमिनीवर बालोद्यानाला सुरुवात करण्यात आली. मात्र या उद्यानाला शासनाकडून कोणताही निधी येत नसल्यामुळे बामणवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्वानंद वाघमारे हे स्वखर्चातून वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन करीत आहेत. सद्यास्थितीत सदर उद्यान हिरवेगार झाले असून लहान बालकांपासून अबाल वृद्ध मोठ्या प्रमाणात या उद्यानामध्ये येत आहेत. त्यामुळे या उद्यांनाला अधिक आकर्षीत करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त या उद्यानामध्ये निम, आंबा, पिंपळ, करंजी, जांभूळ, करवंत, पाम, गुलमोहर यासह विविध फुले व वनौषधींची लागवड करयात आली आहे. त्यामुळे उद्यानाचा परिसर हिरवागार दिसून येत आहे. मुंबई येथील एका बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या आसपासची गावे दत्तक घेऊन तेथील लोकसंख्येएवढी झाडे लावावीत व संपूर्ण गाव हिरवेगार करावे, असे आवाहन केले होते. वृक्ष लागवडीच्या महायोजनेला प्रभावित होऊन सर्वानंद वाघमारे यांनी इतर नागरिकांच्या सहकार्याने, स्वखर्चातून व लोकसहभागातून वृक्षलागवड व बालोद्यानाची निर्मिती केली.उद्यानातील झाडांना उन्हापासून वाचविण्याकरिता ते स्वत: टिकेदार यांच्या घरच्या खासगी बोअरवेलमधून पाण्याचा वापर करून झाडांना देत आहेत. वाघमारे यांनी स्वत: बालोद्यानाचा एक सुंदर प्रकल्प तयार केला. त्याच्या प्रती आमदार ते पंतप्रधान यांच्यामार्फत पाठविल्या. पालकमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावरून मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांनी या बालोद्यानाच्या जागेची तपासणी करून प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी तत्काळ पाठविण्याचे निर्देश दिले. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बालोद्यानाची जागा महसूल विभागाची असल्यामुळे आम्ही निधी उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे सांगितले.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हिरवेगार करण्याच्या वनमंत्र्यांच्या स्वप्नात सहभागी झालेले बामणवाडा येथील नागरिक निधीअभावी हिरमुसले आहेत. अजूनही त्यांना शासनाच्या सहकार्याची प्रतीक्षा आहे. एकीकडे शासन शेकडो वृक्षलागवडीही मोहीम राबवीत आहेत, तर दुसरीकडे स्वत: पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून वृक्षलागवडीकरिता सरसावलेल्या नागरिकांवर निधीअभावी हतबल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या उद्यानासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.