आधी प्रतीक्षा २0१४ ची, आता नजर १६ मे वर
By Admin | Updated: May 9, 2014 02:59 IST2014-05-09T02:59:03+5:302014-05-09T02:59:03+5:30
२0१४ ला होणार्या लोकसभा निवडणुकीवर राजकारण्यांचे लक्ष गेल्या दीड-दोन वर्षांपासून लागले होते. कधी २0१४ हे वर्ष उजाडते आणि कधी लोकसभा निवडणूक येते ही उत्सुकता सार्यांच्या मनात होती.

आधी प्रतीक्षा २0१४ ची, आता नजर १६ मे वर
नागरिकांत उत्सुकता : चंद्रपूर लोकसभेतील अंदाज अपना अपना
वसंत खेडेकर■ बल्लारपूर
२0१४ ला होणार्या लोकसभा निवडणुकीवर राजकारण्यांचे लक्ष गेल्या दीड-दोन वर्षांपासून लागले होते. कधी २0१४ हे वर्ष उजाडते आणि कधी लोकसभा निवडणूक येते ही उत्सुकता सार्यांच्या मनात होती. २0१२ व त्यानंतर २0१३ हे वर्ष उजाडले. या दोनही वर्षांचे त्या-त्या वर्षींच्या १ जानेवारीला राजकारण्यांनी स्वागत केले असले तरी त्यांचे सारे लक्ष २0१४ या वर्षाच्या उजाडण्याकडे लागले होते.
२0१४ ला होणार्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सारे राजकीय पक्ष व राजकारणी दोन-दीड वर्षांपासून लागले होते. व्यूहरचना आखली जाऊ लागली होती. २0१४ हे वर्ष आले. अतिमहत्वाचे निवडणूक वर्ष म्हणून २0१४ या वर्षाचे सार्यांनी मनापासून स्वागत केले. लोकसभा निवडणूक कधी घोषित होणार, याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन मतदानाचा पहिला टप्पा १0 एप्रिलला पार पडला. टप्प्या टप्प्याने ही निवडणूक १२ मेपर्यंत होणार आहे. आणि याचा निकाल १६ मे रोजी लागणार आहे. ज्या क्षेत्रातील मतदान आटोपले आहे, तेथे कोण निवडून येणार यावर चर्चा झडत आहेत. संपूर्ण भारतात, भाजपाला किती जागा मिळणार, काँग्रेस कुठपर्यंत धाव घेईल.अरविंद केजरीवाल यांच्या 'आप' पक्षाच्या विजयाचा आकडा कुठे जाऊन थांबणार, याचे आपापल्या परीने आराखडे बांधले जात आहेत. काहीजण भाजपा दोनशेच्या आतच गाशा गुंडाळणार असे बोलत आहेत, तर कुठे काँग्रेसपक्ष भाजपाच्या आकड्यांच्या जवळपास जाऊन थांबणार, असा अंदाज लावला जात आहे. दिल्लीचा कडू अनुभव घेता आप दहा-बाराच्या वर जाणार नाही, असे सर्वत्र बोलले जात आहे. प्रादेशिक पक्षांच्या किती जागा मिळणार, खरेच मोदीच पंतप्रधान बनणार, राजनाथ सिंह, अरुण जेटली की सुषमा स्वराज याही चर्चा रंगत आहेत. प्रियंका गांधी बर्याच उशिरा मैदानावर आल्या. याआधी येऊन आजच्या एवढ्या आक्रमक झाल्या असत्या तर काँग्रेसची स्थिती सुधारली असती असे सारेजण म्हणत आहेत.
चंद्रपूर लोकसभेबाबत बोलायचे झाल्यास काँग्रेस, भाजपा आणि आप हे तीनही पक्ष आपलाच उमेदवार निवडून येणार असे ठामपणे सांगत आहेत. त्यातल्या त्यात आप पक्षाचे अँड. वामनराव चटप यांचे सर्मथक तर चटप निवडून आलेच आहेत, अशा आविर्भावात बोलत आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. प्रचारात भाजपा सर्वच आघाडीत पुढे राहिला आहे. पण, चर्चा मात्र सर्वाधिक आपच्या झाडूचीच चालली. चटप यांच्या पाठीशी त्यांचा धनोजे कुणबी समाज मागील निवडणुकीप्रमाणे पूर्ण शक्तीनिशी राहिला. संजय देवतळे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेतृत्वावर नाराज झालेला काँग्रेसचा पुगलिया गटही अँड. चटप यांच्यासोबत गेला. अरविंद केजरीवाल यांच्यामुळे, हिंदी भाषिक मतदार कधी नव्हे ते या घडीला अँड. चटप यांच्या सर्मथनात नाव घेताना दिसला. या सार्या कारणापायी चटप यांचा झाडू शहर आणि गाव दोनही पातळीवर बराच चर्चेत आला. या चर्चेचे रूपांतर मतदानात नक्कीच झाले, असा ठाम विश्वास 'आप'वाल्यांना आहे. तसेच, आपच्या केंद्रीय नेत्यांनी चंद्रपूरची आपची जागा पक्की असे गृहीत धरले आहे.
मोदीमय वातावरणात भाजपाने चंद्रपुरात आपला विजय पक्का मानने स्वाभाविक आहे. जोरदार मोदी लाट, भाजपाचे परंपरागत मतदार, हवा बघून त्या दिशेने झुकणारे मतदार आणि सर्वांत महत्वाचे नवीन तसेच युवा मतदारांपैकी बहुतांश मतदार भाजपाकडेच वळले आहेत, हा विश्वास. या सार्या जमेच्या बाजू भाजपाला दिसत आहेत. त्यामुळे, चंद्रपुरातून हंसराज अहीर हेच बाजी मारणार ही खात्री भाजपाला आहे. परंतु, दुसरीकडे केंद्रात ज्या पक्षाचे सरकार, चंद्रपूरला नेमके त्या पक्षाच्या विरोधातील पक्षाचा खासदार असे योगायोगाने घडत गेले. असा अनुभव चार निवडणुकीत आला आहे. या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती तर होणार नाही ना, अशी भीती स्पशरून जाण्याला बरीच जागा आहे. कारण, या घडीला केंद्रात भाजपाची सत्ता येण्याची अधिक शक्यता दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रचारात आप पक्षाच्या पुढे तर भाजपाच्या बराच मागे दिसला. काँग्रेस पक्षात यावेळच्या प्रचारात मागील तीन निवडणुकीमधून दिसलेला जोश उत्साह आढळला नाही. काँग्रेसवालेही खासगीत हे कबूल करतात. तरीही पंजाच निवडून येणार असे काँग्रेसजनांचे ठाम म्हणणे आहे.