विजेच्या लपंडावाने गावकरी संतापले

By Admin | Updated: September 1, 2015 00:49 IST2015-09-01T00:49:14+5:302015-09-01T00:49:14+5:30

मागील अनेक दिवसांपासून कोठारी परिसरात सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने गावकरी त्रस्त झाले होते.

The villagers are angry with the lightning scandal | विजेच्या लपंडावाने गावकरी संतापले

विजेच्या लपंडावाने गावकरी संतापले

कोठारी : मागील अनेक दिवसांपासून कोठारी परिसरात सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने गावकरी त्रस्त झाले होते. अशात २७ ते २८ आॅगस्ट या ४८ तासात सतत वीज खंडीत राहिल्याने व गावात काळोख पसरला असल्याने गर्मीने व डासांच्या प्रकोपाने त्रस्त गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. रात्री ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान गावकऱ्यांनी ३३ केव्ही वीज कार्यालयावर हल्ला चढविला. त्यात नोटीस बोर्डाची तोडफोड व सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की झाली.
कोठारी येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. मात्र निर्माण झाल्यापासून या उपकेंद्राला समस्यांचे ग्रहण लागले. विविध कारणापोटी व जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी गावकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून सदैव त्रास होऊ लागला. या उपकेंद्राकडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाहीत. सुरळीत व नियमित वीज पुरवठा करण्यासाठी यंत्रणा तत्पर नाही. कोणताही अधिकारी, इंजीनिअर, लाईनमन, वायरमन मुख्यालयात हजर राहत नाहीत. गावातील वीज समस्येची पूर्तत: करण्यासाठी कुणी जबाबदार अधिकारी हजर राहत नाही. परिणामी सदर उपकेंद्र केवळ वीज वितरण कंपनीची शोभेची वास्तू ठरत आहे.
कोठारी वीज उपकेंद्र सुरू झाल्यापासून या उपकेंद्राला बामणीवरुन वीज पुरवठा केला जातो. बामणी येथून कोठारीला नियमित पुरवठा होऊ शकत नाही, त्यामुळे वीज नेहमी खंडीत होत असते. खंडित वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी यांच्याकडे अन्य पर्याय नाहीत. त्यामुळे केवळ एकाच पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. ही समस्या नियमित झाली आहे. तरीही वरिष्ठ वीज अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. गोंडपिपरी, राजुरा, विरूर येथून वीज पुरवठा घेण्यासाठी तजवीज करण्यात आली नाही. परिणामी कोठारी व परिसरातील २०-२५ गावकऱ्यांना सतत वीज समस्येला समोर जावे लागत आहे.
मागील एक महिन्याअगोदर विजेची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्याबद्दल ‘लोकमत’ने वृत्तपत्रातून समस्या उचलून धरली. त्यावेळी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या चंद्रपूर येथील कार्यकर्त्यांना कोठारीत पाठवून उपविभागीय वीज अधिकारी कनोजे यांच्याशी बैठक घेऊन यापूढे कोठारीत विजेची समस्या असायला नको. समस्येपूर्वीच आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून वीज अखंडीत सुरळीत पुरवठा केला जाणार, असे अभिवचन दिले. मात्र एका महिण्यात कनोजेचे आश्वासन हवेत विरले. विजेची समस्या जैसे थे आहे. अशात गावकऱ्यांचा संताप शिगेला पोहचून वीज कार्यालयावर हल्ला करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: The villagers are angry with the lightning scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.