दारुबंदीसाठी स्थापणार गावनिहाय समित्या

By Admin | Updated: May 31, 2015 01:54 IST2015-05-31T01:54:16+5:302015-05-31T01:54:16+5:30

दारुबंदी हा विषय तात्पुरता नसून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा आहे. यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, त्याशिवाय प्रभावी यश दिसणार नाही.

Village wise committees established for liquor ban | दारुबंदीसाठी स्थापणार गावनिहाय समित्या

दारुबंदीसाठी स्थापणार गावनिहाय समित्या

वित्तमंत्री म्हणतात : पावसाळी अधिवशेनात कायद्यात बदल करणार
चंद्रपूर: दारुबंदी हा विषय तात्पुरता नसून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा आहे. यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, त्याशिवाय प्रभावी यश दिसणार नाही. हे लक्षात घेऊन दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी गावनिहाय समित्या तयार केल्या जातील. जिल्हाभरातील अंदाजे दोन हजार समित्यामध्ये २० हजार महिला व ८४७ सरपंचांचा समावेश असेल. या समित्यानना कायदेशिर अधिकारही दिले जातील, असा मानस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी दारुबंदी अंमलबजावणी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.पी. कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सुरेंद्र्र मनपिया, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी व पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रशासनाला निर्देश नेताना ना.मुनगंटीवार म्हणाले, दारुबंदी संबंधी नागुिरकांमध्ये जनजागृती करायला हवी. ग्राम पंचायत व पंचायत समिती स्तरावर व्यसनमुक्तीचे मेळावे घेण्यात घेतले जावे, अशी अपेक्षा त्याननी व्यक्त केली.
पोलीस विभागाने दारुबंदी अंमलबजावणीसाठी विशेष शाखा स्थापन करण्याच्या सुचना त्याननी केल्या. तक्रार निवारणासाठी व तक्रारदाराला फिडबॅक देण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर तयार करता येईल का यावर विचार करावा, असे त्यांनी सुचविले. पोलीस विभागाने दारु विकणाऱ्यांना पाठीशी न घालता कडक कारवाई करावी. वर कडक कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ही लढाई सोपी नसल्याने एकत्रितपणे लढण्यासाठी त्यांनी यंत्रणेला आवाहन केले.
दारूबंदीसंर्भातील कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत ८४८ कारवाया करण्यात आल्या असून ५५ लाख रूपयांची दारु जप्त केली आहे. टोल फ्री नंबरवर ५१६ कॉल प्राप्त झाले असून ब-याच ठिकाणी कारवाई यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉल करणा-या व्यक्तीला काय कारवाई झाली याबाबत फिडबँक देण्याचे काम सुरु केल्याचे ते म्हणाले. मद्य चाचणी प्रयोग शाळा चंद्रपुरात असावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बैठकीला सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
ंपावसाळी अधिवेशनात कायद्यात बदल
ना. मुनगंटीवार म्हणाले, दारूबंदीसंदर्भातील सध्याच्या प्रचलित कायद्यामुळे या अवैध व्यवसायात गुंतलेल्यांवर कडक कारवाई होत नाही. कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन हे अवैध व्यावसायिक लवकर तुरूंगाबाहेर येतात. दारु विकणे व वहन करणे यासाठी शिक्षेची तरतूद कमी आहे. हा अडथळा लक्षात घेता, येत्या पावसाळी अधिवेशनात दारूविक्रसंर्भातील कायद्यामध्ये मोठया प्रमाणात बदल करुन कडक शिक्षेची तरतूद करण्यात येईल.

Web Title: Village wise committees established for liquor ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.