शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे भाजपात जाणार; राष्ट्रवादीला मोठा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 19:34 IST

Chandrapur News विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांनी येथे बुधवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.

 

चंद्रपूर : विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांनी येथे बुधवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळापेक्षा फडणवीस सरकारच्या काळात ओबीसींबाबत सर्वाधिक निर्णय झाले. भाजप सरकारच ओबीसींना न्याय देण्यास सक्षम आहे. भाजप प्रवेशामागे हे प्रमुख कारण असल्याचे डाॅ. जीवतोडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ही राजकीय घडामोड राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या २५ जूनला चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी ३ वाजता डाॅ. जीवतोडे यांच्या भाजप प्रवेशाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून हा पक्षप्रवेश घडवून आणणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्याच नव्हे, तर विदर्भातील राजकारणातील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

डाॅ. जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात वजनदार ओबीसी नेता लाभला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. या काळात राष्ट्रवादीचे सर्वच नेते डाॅ. जीवतोडे यांच्याकडे येऊन गेले. मात्र, पक्षाने जीवतोडे यांच्यावर कोणतीच महत्त्वाची जबाबदारी सोपविली नाही. परिणामी, जीवतोडेंचा अपेक्षाभंग झाला. ‘ओबीसी नेते’ म्हणून ते ओळखले जातात. महाविकास आघाडीच्या काळात ओबीसींना न्याय मिळवून देऊ शकलो नाही, याची खंत त्यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर ते नाराज असल्याचा सूर होता. नेमक्या याच संधीचे भाजपने सोने केले. नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरातील मातोश्री वृद्धाश्रमात डाॅ. जीवतोडे यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. यावेळी डाॅ. जीवतोडे यांना भाजपची ऑफर दिली तेव्हापासून डाॅ. जीवतोडे यांचे मन राष्ट्रवादीत रमत नव्हते.

भाजपची खेळी यशस्वी

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हयातीतच डाॅ. अशोक जीवतोडे हे भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. या प्रवेशापूर्वी दुर्दैवाने खासदार धानोरकर यांचे अकाली निधन झाले. धानोरकर हे ओबीसी नेते होते शिवाय ते कुणबी समाजाचेही नेते होते. त्यांच्या जाण्याने कुणबी समाजाची मोठी हानी झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कुणबी समाजाला लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. डाॅ. अशोक जीवतोडे या चौकटीत सर्व बाजूने तंतोतंत बसतात. त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. ते सर्वांशी जुळवून घेतात. या पार्श्वभूमीवर भाजपने ही यशस्वी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस