शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

संतप्त प्रकल्पग्रस्तांनी रोखली वेकोलीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST

गोवरी : वेकोलीने कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. जमिनीवर वेकोलीने खोदकाम करून खाणीतील कोळसा काढल्यानंतरही प्रकल्पग्रस्त १८ शेतकऱ्यांना ...

गोवरी : वेकोलीने कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. जमिनीवर वेकोलीने खोदकाम करून खाणीतील कोळसा काढल्यानंतरही प्रकल्पग्रस्त १८ शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला व नोकरी दिली नाही. हा अन्याय असल्याचा आरोप करीत संतप्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वेकोलीच्या पोवनी ०२ कोळसा खाणीची कोळसा वाहतूक तब्बल तीन तास रोखून धरली.

राजुरा तालुक्यातील पोवनी ०२ कोळसा खाणींचे २०१६ला निर्माण झाले. यासाठी साखरी, पोवनी, वरोडा, चिंचोली(खु), हिरापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने अधिग्रहित केल्या. यासाठी २३६ शेतकऱ्यांना नोकऱ्या आणि जमिनीचा मोबदला देण्याचे ठरले. ६ वर्षांंचा प्रदीर्घ काळ लोटला, तरी वेकोलीने काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी व जमिनीचा मोबदला दिला नाही. पाठपुरावा केल्यानंतरही वेकोली प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. भाजप नेते राजू घरोटे यांचे नेतृत्वात प्रकल्पग्रस्त शेतकरी श्रीनिवास हुडिम, सागर काटवले, संतोष दाभेकर, विक्रम बोतला, कोलिकापा रामचंद्र, किरणकुमार सिंगाराव, प्रतापकुमार सिंगाराव, शीतल नगराळे, चरणदास जंजली, पंकज पोतले, सतीश मुसळे, प्रवीण घोरपडे, चंद्रकांत पिंपळकर, धर्मराज ऊरकुडे, अरुण ऊरकुडे, राहुल घरोटे, मंगेश ऊरकुडे, रवींद्र आवारी यांनी कुटुंबासह पोवनी ०२ कोळसा खाणीत तब्बल ३ तास वेकोलीची कोळसा वाहतूक रोखून धरली. वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक (कार्यकारी) सी.पी. सिंह, क्षेत्रीय योजना अधिकारी पुल्लया, पोवनी २चे सब एरिया मॅनेजर जे.एकंभरम, खाण प्रबंधक बी.आर. सोळंकी, क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी कृष्णाजी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलीच्या क्षेत्रीय नागपूर कार्यालयाकडून कोल मंत्रालयाला तीन दिवसांत पत्र पाठविण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. यानंतर, आंदोलन मागे घेण्यात आले. देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राजुरा पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.