शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त प्रकल्पग्रस्तांनी रोखली वेकोलीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST

गोवरी : वेकोलीने कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. जमिनीवर वेकोलीने खोदकाम करून खाणीतील कोळसा काढल्यानंतरही प्रकल्पग्रस्त १८ शेतकऱ्यांना ...

गोवरी : वेकोलीने कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. जमिनीवर वेकोलीने खोदकाम करून खाणीतील कोळसा काढल्यानंतरही प्रकल्पग्रस्त १८ शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला व नोकरी दिली नाही. हा अन्याय असल्याचा आरोप करीत संतप्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वेकोलीच्या पोवनी ०२ कोळसा खाणीची कोळसा वाहतूक तब्बल तीन तास रोखून धरली.

राजुरा तालुक्यातील पोवनी ०२ कोळसा खाणींचे २०१६ला निर्माण झाले. यासाठी साखरी, पोवनी, वरोडा, चिंचोली(खु), हिरापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने अधिग्रहित केल्या. यासाठी २३६ शेतकऱ्यांना नोकऱ्या आणि जमिनीचा मोबदला देण्याचे ठरले. ६ वर्षांंचा प्रदीर्घ काळ लोटला, तरी वेकोलीने काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी व जमिनीचा मोबदला दिला नाही. पाठपुरावा केल्यानंतरही वेकोली प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. भाजप नेते राजू घरोटे यांचे नेतृत्वात प्रकल्पग्रस्त शेतकरी श्रीनिवास हुडिम, सागर काटवले, संतोष दाभेकर, विक्रम बोतला, कोलिकापा रामचंद्र, किरणकुमार सिंगाराव, प्रतापकुमार सिंगाराव, शीतल नगराळे, चरणदास जंजली, पंकज पोतले, सतीश मुसळे, प्रवीण घोरपडे, चंद्रकांत पिंपळकर, धर्मराज ऊरकुडे, अरुण ऊरकुडे, राहुल घरोटे, मंगेश ऊरकुडे, रवींद्र आवारी यांनी कुटुंबासह पोवनी ०२ कोळसा खाणीत तब्बल ३ तास वेकोलीची कोळसा वाहतूक रोखून धरली. वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक (कार्यकारी) सी.पी. सिंह, क्षेत्रीय योजना अधिकारी पुल्लया, पोवनी २चे सब एरिया मॅनेजर जे.एकंभरम, खाण प्रबंधक बी.आर. सोळंकी, क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी कृष्णाजी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलीच्या क्षेत्रीय नागपूर कार्यालयाकडून कोल मंत्रालयाला तीन दिवसांत पत्र पाठविण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. यानंतर, आंदोलन मागे घेण्यात आले. देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राजुरा पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.