शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

अवकाळी वादळी पावसाचा पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्याची खरेदी करून लागवड केली. त्यानंतरही अनेक भागात कमी पाऊस झाला.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : सर्वेक्षण करून तात्काळ भरपाई मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकरी रब्बी हंगामातील भाजीपाला व अन्य पिकांची काळजी घेत असतानाच गुरूवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी अकाली वादळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन असल्याने रब्बी हंगामातील कापसाची विक्री कुठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्याची खरेदी करून लागवड केली. त्यानंतरही अनेक भागात कमी पाऊस झाला. सोयाबीन, कापूस या खरीप पिकांचे आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. शेतकºयांना रब्बी पिकाच्या उत्पादनाची आशा होती. पीकही चांगले आले. ऐन पीक काढणीला आले असताना, मार्च अखेरीस कोरोनाने देशात धुमाकूळ घातला. हंगामातील गहू, हरभरा या पिकांची विक्री कुठे करायची, असा प्रश्न आता शेतकºयांसमोर आहे.कपाशी पेरा घटणारखरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यंदा जिल्ह्यात कपाशीचा पेरा घटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोयाबीन, तूर व इतर पिकांचा पेरा अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती. संकटावर मात करीत यंदा खरीप तयारीसाठी शेतकरी कामाला लागला आहे. शेतांमध्ये खरिपासाठी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी व मजुरांद्वारे कोळपणी करण्याची कामे सुरू आहेत. रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने मजूर कामात व्यस्त आहेत. बँकेच्या नियमित कर्जदारांना पीक कर्जाचे वितरण एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच वितरणाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणे गरजेचे झाले आहे.धान, गहू उत्पादनात घटजिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धान, सोयाबीन उत्पादन घटले. गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने खर्चाच्या तुलनेत उत्पन्न झाले नाही. गव्हाची शेती तोट्यात गेल्याने खर्चाचा मेळ घालणे कठीण झाले आहे.कापूस घरात पडूनशेतकऱ्यांनी भाव कमी असल्यामुळे अद्याप कापूस विकला नाही. भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला. मात्र, लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. घरात ठेवलेल्या कापसाची विक्री कशी करायची, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी