शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी वादळी पावसाचा पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्याची खरेदी करून लागवड केली. त्यानंतरही अनेक भागात कमी पाऊस झाला.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : सर्वेक्षण करून तात्काळ भरपाई मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकरी रब्बी हंगामातील भाजीपाला व अन्य पिकांची काळजी घेत असतानाच गुरूवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी अकाली वादळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन असल्याने रब्बी हंगामातील कापसाची विक्री कुठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्याची खरेदी करून लागवड केली. त्यानंतरही अनेक भागात कमी पाऊस झाला. सोयाबीन, कापूस या खरीप पिकांचे आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. शेतकºयांना रब्बी पिकाच्या उत्पादनाची आशा होती. पीकही चांगले आले. ऐन पीक काढणीला आले असताना, मार्च अखेरीस कोरोनाने देशात धुमाकूळ घातला. हंगामातील गहू, हरभरा या पिकांची विक्री कुठे करायची, असा प्रश्न आता शेतकºयांसमोर आहे.कपाशी पेरा घटणारखरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यंदा जिल्ह्यात कपाशीचा पेरा घटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोयाबीन, तूर व इतर पिकांचा पेरा अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती. संकटावर मात करीत यंदा खरीप तयारीसाठी शेतकरी कामाला लागला आहे. शेतांमध्ये खरिपासाठी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी व मजुरांद्वारे कोळपणी करण्याची कामे सुरू आहेत. रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने मजूर कामात व्यस्त आहेत. बँकेच्या नियमित कर्जदारांना पीक कर्जाचे वितरण एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच वितरणाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणे गरजेचे झाले आहे.धान, गहू उत्पादनात घटजिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धान, सोयाबीन उत्पादन घटले. गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने खर्चाच्या तुलनेत उत्पन्न झाले नाही. गव्हाची शेती तोट्यात गेल्याने खर्चाचा मेळ घालणे कठीण झाले आहे.कापूस घरात पडूनशेतकऱ्यांनी भाव कमी असल्यामुळे अद्याप कापूस विकला नाही. भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला. मात्र, लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. घरात ठेवलेल्या कापसाची विक्री कशी करायची, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी