शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

नव्या दुचाकीसोबत दोन हेल्मेट अनिवार्य, शासनाचे आरटीओंना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 13:34 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना संरक्षक शिरोवेस्टन (हेल्मेट) अनिवार्य केलेले आहे. मात्र याची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे शासनाने आता खरी नस ओळखली आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना संरक्षक शिरोवेस्टन (हेल्मेट) अनिवार्य केलेले आहे. वाहन विक्रेत्यांनी दुचाकी विकताना सोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे.वाहनाची आरटीओत नोंदच केली जाणार नसल्याचे निर्देश राज्य शासनाने राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. 

चंद्रपूर : न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना संरक्षक शिरोवेस्टन (हेल्मेट) अनिवार्य केलेले आहे. मात्र याची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे शासनाने आता खरी नस ओळखली आहे. वाहन विक्रेत्यांनी दुचाकी विकताना सोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा वाहनाची आरटीओत नोंदच केली जाणार नसल्याचे निर्देश राज्य शासनाने राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. 

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहन विक्रेत्यांना पत्र पाठवून दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे बजावले आहेत. यामध्ये न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने व कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकी वाहन उत्पादकांच्या सर्व विक्रेत्यांना दुचाकी वाहन विक्री करतेवेळी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याविषयी निर्देशित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याबाबत अवगतही केले आहे. विक्रेत्याने दोन हेल्मेट पुरविण्यात आले याबाबतचे पत्र जोडून वाहनाची नोंदणी करावी. याचे उल्लंघन झाल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १३८ च्या उपनियम ४ एफ प्रमाणे कार्यवाही करण्याची तंबीही दिलेली आहे. शिवाय दुचाकी वाहनांची नोंदणी केल्या जाणार नसल्याचे वाहन विक्रेत्यांना बजावले आहे. 

दुचाकी वाहनांना होणाऱ्या अपघातात जीव जाण्यामागे हेल्मेट नसणे हे महत्त्वाचे कारण पुढे आले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता ही बाब अनेकवार पुढे आली आहे. यामुळे हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्यामुळे शासनाने नवीन पद्धत अवलंबिली आहे. दुचाकी विक्रेत्यांनी वाहन खरेदीदारास दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्यामागे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.

दुचाकीस्वारांना होत असलेल्या अपघातात बहुतांशवेळी हेल्मेट नसल्यामुळे जीव जातो. दोन वाहनांची धडक झाल्यास डोक्याला मार लागण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहन घसरून पडले तरी डोक्याला मार लागून जीव जात असल्याच्या घटना घडत आहे. यावर नियंत्रण आणून जीव वाचविण्यासाठी प्रत्येक दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. वाहन विक्रेत्यांनी वाहन खरेदीदारास दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. अन्यथा वाहनाची नोंदच केली जाणार नाही, असे निर्देश आहेत.

- विश्वांभर शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.

 

टॅग्स :bikeबाईकTrafficवाहतूक कोंडीCourtन्यायालय