क्षमतेएवढ्या वीज निर्मितीसाठी प्रयत्न करा
By Admin | Updated: December 21, 2014 22:56 IST2014-12-21T22:56:50+5:302014-12-21T22:56:50+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा दुसरा संच तत्काळ बंद करणे व वीज उत्पादन क्षमता वाढविण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले.

क्षमतेएवढ्या वीज निर्मितीसाठी प्रयत्न करा
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा दुसरा संच तत्काळ बंद करणे व वीज उत्पादन क्षमता वाढविण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले.
विद्युत समन्वय समितीची आढावा सभा २० आॅक्टोबर रोजी विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे जिल्हा सचिव राहुल सराफ, महाऔष्णीक केंद्राचे मुख्य अभियंता आर. पी. बुरडे, उपमुख्य अभियंता एस. बी. सोनी, उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे प्रकरणे १९८३ च्या शासन निर्णयाप्रमाणे मार्गी लावण्याचे निर्देशही केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी दिले. कंपनीने सामाजिक दायित्त्व निधीतून प्रकल्पग्रस्त गावांचा विकास करावा, पॉवरप्लॉट पासून होणारे प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करावे, महाऔष्णिक विद्युत केंद्रात पुरवठा होणाऱ्या कोळशाची चोरी, अफरातफरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही, जीपीएस प्रणालीचा वापर करण्याच्या सुचनाही यावेळी चर्चेदरम्यान ना. अहीर यांनी मुख्य अभियंता यांना दिल्या. खासगी सुरक्षा प्रहरी ऐवजी प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण देवून नोकरीवर घेण्याची सुचनाही त्यांनी केली. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात जे ठेकेदार ३०-३१ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या सोयीच्या अटी व शर्तीनुसार टेंडर नोटीस काढले जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर विद्युत नियामक मंडळात ६० लाखांपर्यंतची कामे सिव्हील इंजिनिअर बेरोजगार अभियंता यांना देण्याची कार्यवाही करावी, असेही ना. अहीर म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)