शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

गोंडवानाच्या शुल्कवाढीने गरीब विद्यार्थी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:12 PM

गोंडवाना विद्यापीठाने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना माफक दरात शैक्षणिक सुविधा देण्याऐवजी यंदाच्या सत्रात अन्यायकारक शुल्कवाढ केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुल्कवाढ मागे घेतली नाही तर शेकडो विद्यार्थी अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यताही शैक्षणिक वर्तुळात वर्तविली जात आहे़

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये संताप : भरमसाठ फीवाढ रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना माफक दरात शैक्षणिक सुविधा देण्याऐवजी यंदाच्या सत्रात अन्यायकारक शुल्कवाढ केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुल्कवाढ मागे घेतली नाही तर शेकडो विद्यार्थी अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यताही शैक्षणिक वर्तुळात वर्तविली जात आहे़चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब व विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्चशिक्षण मिळावे, यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये संलग्न आहेत. मागील तीन वर्षांपासून विद्यापीठात विविध शाखांचे नवीन अभ्यासक्रम सुरू झालेत. व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली. परंतु बदलत्या शैक्षणिक स्पर्धेत या विद्यापीठाला अजुनही स्वत:ची प्रतिमा उंचावता आली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी, या हेतूने प्रवेशशुल्क वाजवी ठेवून विविध योजना राबविणे गरजेचे आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने यंदा प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली. त्यामुळे शेतकरी व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश घेणे कठीण होणार आहे. मागील सत्रात बीए, बीकॉम, बीएसडब्ल्यू या अभ्यासक्रमासाठी ५ हजार ३०० रूपये प्रवेश शुल्क होते. यंदा ८ हजार ९२० रूपये भरावे लागणार आहेत. मास्टर आॅफ लेबर स्टडी एमए तसेच अन्य पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७ हजार ८०० रूपये शुल्क होते़ ते आता ११ हजार ४३३ रूपये करण्यात आले़ एमए मॉस कम्युनिकेशन या अभ्यासक्रमातही मोठी वाढ केल्याने विद्यार्थ्यांना यंदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावा लागणार आहे़ शुल्क वाढीने पालकही नाराज झाले आहेत़जनसंवाद अभ्यासक्रम महागलाशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी अन्य विद्याशाखांचा अभ्यास केल्यानंतर जनसंवाद अभ्यासक्रमाकडेही आकर्षित होत आहे. शासकीय व खासगी संस्थांमध्ये रोजगाराची संधी मिळत असल्याने हा अभ्यासक्रम करिअरसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. परंतु, यंदा गोंडवाना विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली़ मागील शैक्षणिक सत्रात आठ हजार ७०० रूपयात प्रवेश दिला जात होता़ यंदा १९ हजार ७५४ रूपये शुल्क निर्धारित करण्यात आले़ त्यामुळे या अभ्यासशाखेला विद्यार्थी मिळणे कठीण होणार आहे.राज्यपालांनी हस्तक्षेप करावाविद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याऐवजी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने यंदा चुकीचे धोरण राबविणे सुरू केले. या विद्यापीठाला आधीच फारसे विद्यार्थी मिळत नाही़ तसेच राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत गोंडवाना विद्यापीठाचा दर्जा समाधानकारक नाही, असाही आरोप केला जातो़ त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे असे शुल्क धोरण निश्चित केले पाहिजे. परंतु, याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले़ याचा आर्थिक फटका गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठातील दरवाढ रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत‘ शी बोलताना केली आहे़