शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत रेल्वे प्रवास करताय... ‘तत्काळ’शिवाय पर्याय नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 17:14 IST

दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. नोकरी, शिक्षण, व्यावसायानिमित्त बाहेरगावी असलेले तसेच येथील प्रवासी गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढत आहे. मात्र विशेष ट्रेनचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देआरक्षण वेटिंगकडे : दिवाळीसाठी गावी, सुट्यांत पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून पॅसेंजर बंद आहे. विशेष रेल्वे सुरू आहे. मात्र त्याचे भाडे अतिरिक्त असल्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनाची लोट आता ओसरत असल्यामुळे प्रवाशी पर्यटन तसेच इतर ठिकाणी जाण्याचे नियोजन करीत आहेत. मात्र रेल्वेचे तिकीटही वेटिंग येत असल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. नोकरी, शिक्षण, व्यावसायानिमित्त बाहेरगावी असलेले तसेच येथील प्रवासी गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढत आहे. मात्र विशेष ट्रेनचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पॅसेंजरसह नियमित ट्रेन सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

मुंबई मार्गावरील आरक्षण फुल्ल

दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये रेल्वेचे आरक्षण फुल्ल होत आहे. काही जणांचे आरक्षण वेटिंगवरसुद्धा येत आहेत. मुंबई मार्गावरील रेल्वेचे आरक्षण आगामी काही दिवसांत फुल्ल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पॅसेंजर एक्स्प्रेस कधी सुरू होणार

रेल्वेच्या काही विभागांमध्ये पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात आल्या आहे. मध्य रेल्वेमध्ये मात्र प्रवाशांना वाट बघावी लागत आहे. पॅसेंजरअभावी दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. किमान पॅसेंजर सुरु करून दिलासा देणे गरजेचे आहे.

सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस

नवजीवन

दक्षिण

केरला

दानापूर

तामिलनाडू

तेलंगणा

नंदीग्राम

जीटी

अधिक तिकीटदर मोजण्याची वेळ

कोरोना संकटकाळापासून विशेष रेल्वे सुरू आहे. त्यामुळे तिकिटांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे. जवळच्या ठिकाणी जायचे असेल तरीही अतिरिक्त पैसे मोजून तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, आरक्षण असल्यामुळे अतिरिक्त प्रवाशांना तिकीटही मिळत नाही. त्यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वे विभाग केवळ विशेष ट्रेन चालवत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे बेहाल सुरू आहे. हा प्रकार केवळ मध्य रेल्वे नागपूर डिविजनमध्ये सुरू आहे. चंद्रपूर-बल्लारपूर येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी वर्धा-सेवाग्राम येथून ट्रेन पकडावी लागते. दररोज नाही तर किमान आठवड्यातून दोन दिवस तरी मुंबईसाठी ट्रेन द्यावी, पॅसेंजरही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे बेहाल सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

- श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयू सदस्य,

मध्य रेल्वे मुंबई

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकrailwayरेल्वेSocialसामाजिक