शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

ताडपत्री न झाकताच बांधकाम साहित्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:34 IST

शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : अपघात झाल्यास जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची रस्त्यावर गर्दी असते. अनेकवेळा वाहनातून बांधकाम साहित्य रस्त्यावर पडतात. याकडे संबंधित विभागाने विशेष लक्ष देवून ताडपत्री न लावता बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.शासनाच्या महसूल व वनविभागाने काही वर्षांपूर्वीच परिपत्रक काढून गौण तसेच इतर साहित्याची वाहतूक करताना ट्रक व ट्रॅक्टरची उंची वाढवून ताडपत्री झाकण्याचे आदेश दिले आहे. मात्र याकडे वाहनधारक तसेच वाहक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र आहेत.अनेकवेळा क्षमतेपेक्षा जास्त साहित्य नेण्याचा प्रकारही येथे सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ट्रक व इतर वाहनांच्या अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकवेळा वाहनातील साहित्य रस्त्यावर पडत असल्याने अन्य वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. धावत्या वाहनामुळे मागे असणाºया वाहनधारकांच्या डोळ्यात रेती तसेच धुळ जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यांची क्षमता नसतानाही अनेकवेळा जडवाहतूक केली जात असून वाहन चालक वाहतूक परवाना न बाळगता गौण खनिजाची वाहतूक करतात.चंद्रपूर-नागपूर, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, जिवती-कोरपना मार्गावर मोठ्या प्रमाणात जडवाहतूक तसेच ताडपत्री न झाकता वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक तसेच प्रादेशित परिवहन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.पालकांनो सावधानसध्या शाळा-महाविद्यालय सुरु झाले आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी आॅटो तसेच इतर वाहनाचा आधार घेत आहे. मात्र आपले पाल्य किती सुरक्षित आहे, हे पालकांनी तपासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या अनेक आॅटोंना जाळी बसवलेली नसल्याने एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. आॅटोेचालकाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आॅटोत बसविले काय, हे बघणे गरजेचे आहे. तसेच आॅटोचालकाला काही व्यसन आहे का, असेल तर आपल्या पाल्याला त्या आॅटोमध्ये न पाठविता दुसºयाची निवड करावी तसेच शाळा प्रशासनालाही आॅटोचालकाची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूकरस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूक केल्याने रस्त्यावर खड्डे पडतात. तसेच किनाऱ्यावर व वळणावर रस्ते तुटतात. दगडाची भुकटी देखील हवेत उडते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्याची दुरुस्तीचा प्रश्न उभा ठाकतो. त्यामुळे या वाहतुकीवर आळा घालावा तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.