शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ताडपत्री न झाकताच बांधकाम साहित्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:34 IST

शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : अपघात झाल्यास जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची रस्त्यावर गर्दी असते. अनेकवेळा वाहनातून बांधकाम साहित्य रस्त्यावर पडतात. याकडे संबंधित विभागाने विशेष लक्ष देवून ताडपत्री न लावता बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.शासनाच्या महसूल व वनविभागाने काही वर्षांपूर्वीच परिपत्रक काढून गौण तसेच इतर साहित्याची वाहतूक करताना ट्रक व ट्रॅक्टरची उंची वाढवून ताडपत्री झाकण्याचे आदेश दिले आहे. मात्र याकडे वाहनधारक तसेच वाहक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र आहेत.अनेकवेळा क्षमतेपेक्षा जास्त साहित्य नेण्याचा प्रकारही येथे सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ट्रक व इतर वाहनांच्या अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकवेळा वाहनातील साहित्य रस्त्यावर पडत असल्याने अन्य वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. धावत्या वाहनामुळे मागे असणाºया वाहनधारकांच्या डोळ्यात रेती तसेच धुळ जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यांची क्षमता नसतानाही अनेकवेळा जडवाहतूक केली जात असून वाहन चालक वाहतूक परवाना न बाळगता गौण खनिजाची वाहतूक करतात.चंद्रपूर-नागपूर, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, जिवती-कोरपना मार्गावर मोठ्या प्रमाणात जडवाहतूक तसेच ताडपत्री न झाकता वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक तसेच प्रादेशित परिवहन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.पालकांनो सावधानसध्या शाळा-महाविद्यालय सुरु झाले आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी आॅटो तसेच इतर वाहनाचा आधार घेत आहे. मात्र आपले पाल्य किती सुरक्षित आहे, हे पालकांनी तपासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या अनेक आॅटोंना जाळी बसवलेली नसल्याने एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. आॅटोेचालकाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आॅटोत बसविले काय, हे बघणे गरजेचे आहे. तसेच आॅटोचालकाला काही व्यसन आहे का, असेल तर आपल्या पाल्याला त्या आॅटोमध्ये न पाठविता दुसºयाची निवड करावी तसेच शाळा प्रशासनालाही आॅटोचालकाची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूकरस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूक केल्याने रस्त्यावर खड्डे पडतात. तसेच किनाऱ्यावर व वळणावर रस्ते तुटतात. दगडाची भुकटी देखील हवेत उडते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्याची दुरुस्तीचा प्रश्न उभा ठाकतो. त्यामुळे या वाहतुकीवर आळा घालावा तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.