शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

कोळसा खाणीतून जळत्या कोळशाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 5:00 AM

पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे साईडींगकडे नेला जात असून जळत्या कोळशाची अशी जीवघेणी वाहतूक सुरू आहे.

नितीन मुसळे।लोकमत न्युज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत असलेल्या विविध कोळसा खाणीत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मोठा वाजागाजा करून सुरक्षिततेचे धडे दिल्या जात असले तरी या ठिकाणी होणा-या कामावरून वेकोलि प्रशासन सुरक्षिततेकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोवनी-२ या कोळसा खाणीतून सास्ती रेल्वे साईडींगकडे चक्क जळत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात होती. ही वाहतुक कामगारांच्या व परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोठा ठरणारी आहे.पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे साईडींगकडे नेला जात असून जळत्या कोळशाची अशी जीवघेणी वाहतूक सुरू आहे. पोवनी - २ कोळसा खाणीतून निघालेला कोळसा पोवनी -२ चे चेक पोस्ट, या मार्गावर असलेले पोवनी सब एरीया मॅनेजर यांच्या कार्यालयासमोरून गोवरी चेक पोस्ट पार करून जात असतानासुद्धा याकडे वेकोलि प्रशासनाने लक्ष दिले नाही. शुक्रवारी घडलेल्या या घटनेवरून हेच सिध्द होत आहे. आता याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.वेकोलिचे केवळ उत्पादनवाढीकडे लक्षवेकोलिच्या विविध कोळसा खाणीत मोठया उत्पादनाच्या हेतूने प्रशासन कामगारांच्याच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठले असून कोणतीही सुरक्षितता न पाळता केवळ उत्पादन वाढीकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. कोळसा खाण परिसरात होत असलेली कोळसा वाहतूक अत्यंत जीवघेणी असून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरला जातो. ट्रकांची भरधाव वाहतूक सुरू असते. यामुळे परिसरातील रस्त्यांची दैनावस्था तर झालीच आहे, याशिवाय रस्त्याने कोळसा सांडत जात असल्यामुळे रस्त्यावर कोळशाची धूळ पसरलेली असते. या परिसरातील मार्गावरून तालुक्यातील माथरा, गोवरी, पोवनी, चार्ली, निर्ली, कढोली, धिडशी, साखरी, वरोडा, चिंचोली या परिसरातील नागरिकांची व कोळसा खाणीत काम करणाºया कामगारांची मोठी रहदारी असते. त्यामुळे मार्गावरून होणारी कोळसा वाहतूक जीवघेणी ठरत असून धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वेकोलिच्या कोळसा खाणीतून होणारी कोळसा वाहतूक ही नेहमीच जीवघेणी ठरत आहे. ओव्हरलोड वाहतुक, रस्त्याने भरधाव धावणारे ट्रक, रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने असलेली अवैद्य पार्कीग, ट्रकमधून सांडणारा कोळसा व त्याची धूळ आणि आता जळता कोळसा, जनतेला धोकादायक ठरत आहे. दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे.-अमोल घटे, माजी उपसरपंच, साखरी