शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोळसा खाणीतून जळत्या कोळशाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे साईडींगकडे नेला जात असून जळत्या कोळशाची अशी जीवघेणी वाहतूक सुरू आहे.

नितीन मुसळे।लोकमत न्युज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत असलेल्या विविध कोळसा खाणीत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मोठा वाजागाजा करून सुरक्षिततेचे धडे दिल्या जात असले तरी या ठिकाणी होणा-या कामावरून वेकोलि प्रशासन सुरक्षिततेकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोवनी-२ या कोळसा खाणीतून सास्ती रेल्वे साईडींगकडे चक्क जळत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात होती. ही वाहतुक कामगारांच्या व परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोठा ठरणारी आहे.पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे साईडींगकडे नेला जात असून जळत्या कोळशाची अशी जीवघेणी वाहतूक सुरू आहे. पोवनी - २ कोळसा खाणीतून निघालेला कोळसा पोवनी -२ चे चेक पोस्ट, या मार्गावर असलेले पोवनी सब एरीया मॅनेजर यांच्या कार्यालयासमोरून गोवरी चेक पोस्ट पार करून जात असतानासुद्धा याकडे वेकोलि प्रशासनाने लक्ष दिले नाही. शुक्रवारी घडलेल्या या घटनेवरून हेच सिध्द होत आहे. आता याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.वेकोलिचे केवळ उत्पादनवाढीकडे लक्षवेकोलिच्या विविध कोळसा खाणीत मोठया उत्पादनाच्या हेतूने प्रशासन कामगारांच्याच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठले असून कोणतीही सुरक्षितता न पाळता केवळ उत्पादन वाढीकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. कोळसा खाण परिसरात होत असलेली कोळसा वाहतूक अत्यंत जीवघेणी असून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरला जातो. ट्रकांची भरधाव वाहतूक सुरू असते. यामुळे परिसरातील रस्त्यांची दैनावस्था तर झालीच आहे, याशिवाय रस्त्याने कोळसा सांडत जात असल्यामुळे रस्त्यावर कोळशाची धूळ पसरलेली असते. या परिसरातील मार्गावरून तालुक्यातील माथरा, गोवरी, पोवनी, चार्ली, निर्ली, कढोली, धिडशी, साखरी, वरोडा, चिंचोली या परिसरातील नागरिकांची व कोळसा खाणीत काम करणाºया कामगारांची मोठी रहदारी असते. त्यामुळे मार्गावरून होणारी कोळसा वाहतूक जीवघेणी ठरत असून धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वेकोलिच्या कोळसा खाणीतून होणारी कोळसा वाहतूक ही नेहमीच जीवघेणी ठरत आहे. ओव्हरलोड वाहतुक, रस्त्याने भरधाव धावणारे ट्रक, रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने असलेली अवैद्य पार्कीग, ट्रकमधून सांडणारा कोळसा व त्याची धूळ आणि आता जळता कोळसा, जनतेला धोकादायक ठरत आहे. दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे.-अमोल घटे, माजी उपसरपंच, साखरी