शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

कोळसा खाणीतून जळत्या कोळशाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे साईडींगकडे नेला जात असून जळत्या कोळशाची अशी जीवघेणी वाहतूक सुरू आहे.

नितीन मुसळे।लोकमत न्युज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत असलेल्या विविध कोळसा खाणीत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मोठा वाजागाजा करून सुरक्षिततेचे धडे दिल्या जात असले तरी या ठिकाणी होणा-या कामावरून वेकोलि प्रशासन सुरक्षिततेकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोवनी-२ या कोळसा खाणीतून सास्ती रेल्वे साईडींगकडे चक्क जळत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात होती. ही वाहतुक कामगारांच्या व परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोठा ठरणारी आहे.पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे साईडींगकडे नेला जात असून जळत्या कोळशाची अशी जीवघेणी वाहतूक सुरू आहे. पोवनी - २ कोळसा खाणीतून निघालेला कोळसा पोवनी -२ चे चेक पोस्ट, या मार्गावर असलेले पोवनी सब एरीया मॅनेजर यांच्या कार्यालयासमोरून गोवरी चेक पोस्ट पार करून जात असतानासुद्धा याकडे वेकोलि प्रशासनाने लक्ष दिले नाही. शुक्रवारी घडलेल्या या घटनेवरून हेच सिध्द होत आहे. आता याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.वेकोलिचे केवळ उत्पादनवाढीकडे लक्षवेकोलिच्या विविध कोळसा खाणीत मोठया उत्पादनाच्या हेतूने प्रशासन कामगारांच्याच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठले असून कोणतीही सुरक्षितता न पाळता केवळ उत्पादन वाढीकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. कोळसा खाण परिसरात होत असलेली कोळसा वाहतूक अत्यंत जीवघेणी असून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरला जातो. ट्रकांची भरधाव वाहतूक सुरू असते. यामुळे परिसरातील रस्त्यांची दैनावस्था तर झालीच आहे, याशिवाय रस्त्याने कोळसा सांडत जात असल्यामुळे रस्त्यावर कोळशाची धूळ पसरलेली असते. या परिसरातील मार्गावरून तालुक्यातील माथरा, गोवरी, पोवनी, चार्ली, निर्ली, कढोली, धिडशी, साखरी, वरोडा, चिंचोली या परिसरातील नागरिकांची व कोळसा खाणीत काम करणाºया कामगारांची मोठी रहदारी असते. त्यामुळे मार्गावरून होणारी कोळसा वाहतूक जीवघेणी ठरत असून धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वेकोलिच्या कोळसा खाणीतून होणारी कोळसा वाहतूक ही नेहमीच जीवघेणी ठरत आहे. ओव्हरलोड वाहतुक, रस्त्याने भरधाव धावणारे ट्रक, रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने असलेली अवैद्य पार्कीग, ट्रकमधून सांडणारा कोळसा व त्याची धूळ आणि आता जळता कोळसा, जनतेला धोकादायक ठरत आहे. दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे.-अमोल घटे, माजी उपसरपंच, साखरी